तिथी
|
कार्तिक कृष्ण ४ (२५:३५)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (११:३७)
|
योग
|
शुभ (२२:१७)
|
करण
|
बव (१४:५१), बालव (२५:३५)
|
संकष्ट चतुर्थी / बहुला चतुर्थी
पुणे चंद्रोदय: २१:०५
या चतुर्थीला 'बहुला चतुर्थी' म्हणतात. ही वक्रतुंडाची तिथी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व
दिवस दूध पिऊन व्रत करावे. उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर पुन्हा स्नान करून वक्रतुंडाची
षोडशोपचारे पूजा करावी. नंतर ब्राह्मणभोजन घालून सुवर्णदक्षिणा द्यावी. मग स्वत:
जेवावे. हे व्रत पापविनाशी आहे. यायोगे सर्व दु:खांचे अपहरण होते व सुख मिळते. या
व्रताच्या आचरणाने पूर्वीच्या काळी कर्दम नावाचा राजा क्षयरोगमुक्त होऊन अंती
देवलोकास गेला. तसेच एक पापकर्मा, अत्याचारी चांडाळ अनायासे घडलेल्या व्रताच्या
प्रभावाने देवलोकी गेला.
करक चतुर्थी व्रत
हे एक स्त्रीव्रत आहे.
कार्तिक कृष्ण चतुर्थीस हे व्रत करतात. गौरी ही या व्रताची प्रधान देवता असून शिव, गणेश व कार्तिकेय या गौण देवता आहेत. हे व्रत सायंकाळी करतात. या व्रताचा
विधी-
व्रत-देवतांची चित्रे काढून
ती वडाच्या झाडाखाली पूजास्थानी ठेवतात. मग स्नान संकल्प, गणपतिपूजा इ. झाल्यावर
गौरीची पूजा करतात. मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणा हरिवल्लभे ॥
या व्रतात अन्नधान्य, दीपसहित दहा जलपूर्ण कुंभांचे दान, पोळीचा नैवेद्य, चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्यप्रदान करावयाचे असते.
फल – सौभाग्यप्राप्ती.
दशरथ चतुर्थी
कार्तिक कृष्ण चतुर्थीला 'दशरथ चतुर्थी' असे म्हणतात. हे एक व्रत आहे. एका मातीच्या पात्रात दशरथाची
आणि दूर्गेची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करतात. हिला करक (करक = करा = मातीचे
भांडे ) चतुर्थी असेही म्हणतात.
फल - सर्व प्रकारच्या फलांचा लाभ
घबाड
११:३७ नंतर २५:३५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग
आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: अनुराधा
चंद्र नक्षत्र : पुनर्वसु
तिथी: कृष्ण ४ = १५
+ ४ = १९
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू :
५४ + १९ = ७३
आता ७ ने
भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
चतुर्थी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्थी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक कृष्ण ४ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment