तिथी
|
कार्तिक शुक्ल ५ (२५:५१)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (२६:३८)
|
योग
|
धृति (१४:५७)
|
करण
|
बव (१२:४४), बालव (२५:५१)
|
पांडव पंचमी / कड पंचमी
कार्तिक शुक्ल
पंचमीला पांडव वनवास संपवून परत आले, म्हणून यादिवसाला पांडव
पंचमी असे म्हणतात पांडवांसारखे पुत्र घरात जन्माला यावेत आणि पुत्रांत असलेल्या
गुणांची वृद्धी व्हावी, यांसाठी पांडवांची पूजा करतात.
गायीच्या
शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. पुढील प्रार्थना केली जाते
‘हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे
तुझ्या आदेशाचे पालन करून पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, त्याप्रमाणे आम्हाला समाजातील दुर्जन आणि वाईट शक्ती
यांच्याविरुद्ध युद्ध करून त्यांना नष्ट करता येऊ दे. पांडवांनी जसे तुझे
आज्ञापालन केले, त्याप्रमाणे आम्हाला गुरूंचे आज्ञापालन करून
तुझ्यासारखे गुण आमच्यात आणता येऊ देत. आम्हा सर्वांवर तुझी कृपा सतत असू दे.
जया पंचमी किंवा जयाव्रत
कार्तिक शुद्ध पंचमीस हे
व्रत करतात. गंगादी तीर्थांचे स्मरण करून तिलोद्वर्तन करून स्नान करून शुद्धासनी
बसून भगवान 'हरी'
व त्याच्या डाव्या बाजूस 'जया' ची स्थापना करावी. गंध व विविध फुलांनी प्रेमपूर्वक त्यांची पूजा करून हरीच्या
विविध अंगांची (उदा पावले, गुडघे, छाती, पोट, वक्ष:स्थळ, कंठ, मुख, मस्तक इ. ) पूजा पद्मनाभ, नरसिंह, मन्मथ, दामोदर इ. नावांनी करावी.
'जयाय जयरूपाय जय गोविंदरूपिणे ।
जय दामोदरायेऽति जय सर्व
नमोऽस्तु ते ॥'
या मंत्राने अर्घ्य द्यावे
व सात तर्हेची धान्ये टोपलीत घालून त्यावर लालवस्त्र झाकावे व
'यथा वेणुफलं दृष्ट्वा तुष्यते मधुसूदन: ।
तथा मेहस्तु शुभं सर्वं
वेणुपात्र प्रदानत: ॥
या मंत्राने टोपलीतील
धान्ये ब्राह्मणांना द्यावीत. मग एका वस्त्रात गंधाक्षता, फुले, मोहर्या व दूर्वा घालून 'राखी' तयार करून
'येन बद्धो बलोराजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे
मा चल मा चल ॥'
या मंत्राने रक्षाबंधन
करावे. हे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येसारख्या पापापासून मुक्ती मिळते व सर्व
सुखांचा लाभ होतो.
घबाड
२६:३८ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग
आहे.
सूर्य नक्षत्रापासून
चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात
शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास
घबाड असते.
सूर्य नक्षत्र: विशाखा
चंद्र नक्षत्र : उत्तराषाढा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८
+ ६ = २४
आता ७ ने
भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
मृत्यू योग
२६:३८ नंतर सोमवारी
उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल ५ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment