तिथी
|
कार्तिक शुक्ल २ (२१:२०)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२०:३४)
|
योग
|
शोभन (१५:१७)
|
करण
|
बालव (९:०९), कौलव (२१:२०)
|
यमद्वितीया (भाऊबीज)
कार्तिक शुद्ध द्वितीयेस हे
नाव आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला. या तिथीस यमाची
पूजा करतात, म्हणून या तिथीचा 'यमद्वितीया' असा उल्लेख करतात. तसेच याच दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवण करतो, म्हणून त्यास भाऊबीज असे म्हणतात. हे एक व्रत आहे.
ही तिथी हेमाद्रीच्या मते
मध्याह् नव्यापिनी पूर्वविद्धा भाऊबीज श्रेष्ठ. स्मार्तमतानुसार दिवसाच्या
पाचव्या प्रहरात भाऊबीज श्रेष्ठ. तर स्कंदच्या मते अपराह नव्यापिनी श्रेष्ठ. पण
स्कंदाचे मत सयुक्तिक वाटते.
या दिवशी बहिणीच्या घरी
जाऊन बहिणीकडून भावाने पूजा स्वीकारावी. यावेळी बहिणीने भावास उत्तम आसन देऊन
त्याचे हातपाय धुवावे व गंधाक्षतांनी त्याची पूजा करावी. नंतर भावाने बहिणीस
यथाशक्ती वस्त्रेभूषणे, द्रव्य वगैरे देऊन तिचा बहुमान करावा, व बहिणीने भावास यथाशक्ति त्यास आवडणार्या पदार्थांचे भोजन घालावे.
'भ्राअस्तवानुजाताहं भुङ्क्ष्व भक्तमिमं शुभम् ।
प्रीतये यमराजस्य यमुनाया
विशेषत: ॥'
अशा मंत्राने भावाची स्तुती
करावी. ज्यांना सख्खी बहीण नसेल त्यांनी चुलत बहिणीला, मामे बहिणीला अगर
मित्र-भगिनीला सख्खी बहीण मानून भावाने तिच्या घरी जेवण करावे. या दिवशी यमुनेकाठी
बहिणीच्या हातचे जेवण केल्यास भावाच्या आयुष्यात वाढ व बहिणीच्या नवर्याचे रक्षण
होते.
या दिवशी यमुनेत स्नान करणे
पुण्यकारक मानतात. हा स्नानोत्सव सर्वात मोठा आहे. या दिवशी यमुनेबरोबर यमाची पूजा
करतात.
यमपूजन
१४अर्घ्यदान व तर्पण
या दिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांचे
पूजन करतात.
हे पूजन करताना १४ अर्घ्य
द्यावेत. व पुढील प्रमाणे यमतर्पण करावे.
अपमृत्यू होऊ नये म्हणून पिता
असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी
यमतर्पण करावे.
यमंतर्पयामि |
धर्मराजं तर्पयामि |
मृत्युं तर्पयामि |
अंतकं तर्पयामि |
वैवस्वतं तर्पयामि |
कालं तर्पयामि |
सर्वभूतक्षयकरं तर्पयामि |
औदुम्बरं तर्पयामि |
दध्नं तर्पयामि |
नीलं तर्पयामि |
परमेष्ठिनं तर्पयामि |
वृकोदरं तर्पयामि |
चित्रं तर्पयामि |
चित्रगुप्तं तर्पयामि |
नतर दक्षिणेकडे तोंड करून पाणी, दर्भ व तीळ हातात घेऊन पुधिल् श्लोक १० वेळा म्हणावा.
यमेनिहंता पितृधर्मराजो
वैवस्वतो दंडधरश्च काल: |
भूताधिपो दत्त कृतानुसारी
एतद्द्शभिर्जपंति ||
कांतिव्रत
हे एक काम्य व्रत आहे.
कार्तिक शुद्ध द्वितीयेस प्रारंभ. व्रतावधी एक वर्ष. बलराम, केशव, व चंद्रकोर यांची पूजा करतात. कार्तिकापासून आठ महिने
तिलहोम व आषाढापासून चार महिने घृतहोम. वर्षाच्या शेवटी चंद्राच्या प्रतिमेचे (रौप्यप्रतिमा
) दान.
वैशाख महिन्यात प्रारंभ.
त्या महिन्यात व्रतकर्त्याने मीठ वर्ज्य करायचे असते. व्रतावधी एक वर्ष.
फल - एक कल्पपर्यंत
विष्णुपदाजवळ वास, तसेच कांती आणि कीर्ती यांचा लाभ.
मुस्लीम रबिलावल मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार
रबिलावल मास आरंभ होत आहे.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल २ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment