तिथी
|
निज आषाढ शु १४ (१९:०१)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (११:४६)
|
योग
|
विष्कंभ (१७:५७)
|
करण
|
गरज (०८:१५), विष्टी (२९:४०)
|
कोकिळाव्रतारंभ
हे व्रत अधिक आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत
करतात. सायान्हकाली असलेल्या निज आषाढ पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करून श्रावण
पौर्णिमेस व्रत समाप्ती करावी.
व्रतारंभ करताना सूर्यास्त समयीव्रताचामुख्य संकल्प करावा.
नक्तभोजन, भूशय्या, कोकिळा शब्द श्रवण यापैकी जे नियम करावयाचे असतील त्याचा
त्याचा उच्चार पहिल्या दिवशीच्या संकल्पात करावा. तसेच १ महिना, शेवटचे ७ किंवा ३
दिवस व्रत करायचे असेल तर संकल्पात तेवढ्या दिवसांचा उच्चार करावा.
यामुळे मुख्यतः स्त्रियांना सात जन्मपर्यंत सुत, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होतात.
·
या व्रतात
पार्वतीचे कोकिळेच्या रूपात पूजन केले जाते.
·
आम्र वृक्षावर बसलेल्या
कोकिळेची पूजा केली जाते. रुपयाच्या आम्रवृक्षावर बसलेल्या रत्नजडीत कोकिळेच्या मुर्तीची पुजा दररोज प्रत:काळी
स्नानानंतर केली जाते.
·
हे शक्य नसल्यास पाटावर
आंब्याच्या वृक्षावर बसलेल्या कोकीलेल्चे चित्र काढून त्याची पूजा महिनाभर करावी.
·
महिन्याभर शक्य नसल्यास
शेवटचे सात किंवा तीन दिवस हे व्रत करता येते.
·
पूजेनंतर कोकिळेचा स्वर
ऐकण्याचा नियम केला असल्यास ज्या दिवशी हा स्वर ऐकू येणार नाही त्या दिवशी उपवास
करावा.
व्रतविधी असा या पौर्णिमे दिवशी सांयकांळी स्नान करुन 'मी ब्रह्मचर्य पाळून कोकिलाव्रत करीन' अशी कामना करावी. त्यानंतर श्रावण कृ. प्रतिपदेस नद, नदी, नाला, ओढा, झरा, विहीर, तलाव, सरोवर अगर आड यावर
'मम
धनधान्यादिसहित सौभाग्यप्राप्तये शिवतुष्टये च कोकिलाव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प करुन भिजवून वाटलेल्या आवळ्यांत सुगंधयुक्त
तिळाचे तेल मिसळून ते चोळून स्नान करावे. पुढे आठ दिवसपर्यंत याप्रमाणे स्नान
झाल्यावर पिठाची कोकिळा तयार करुन गंध, फुले, फळे, धूप, दीप व तिळातांदळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखावावा आणि 'तिलस्नेहे ' या मंत्राने प्रार्थना
करावी. याप्रमाणे श्रावण पौर्णिमेपर्यंत करून समाप्तीच्या दिवशी तांब्याच्या
भांड्यात मृत्तिकेची कोकिळा करून तिला सुवर्णाचे पंख, रत्नाचे डोळे लावावेत आणि वस्त्रालंकारांनी विभूषित करून
सासरा, सासू, ज्योतिषी , पुरोहित अगर कथावाचक याला ती भेट द्यावी. यायोगे स्त्री
इहलोकी सुख भोगून शेवटी शिवलोकात जाते.
संत मामा दांडेकर पुण्यतिथी
अंबिकाव्रत
आषाढ शु,.चतुर्दशीला उपवास करुन पौर्णिमेला प्रातःकाळी अंबिकादेवीचे पूजन करण्याने
यज्ञासमान फळ मिळून विष्णुलोक प्राप्त होतो.
हरिपूजा
आषाढ शु. चतुर्दशीला ला उपवास करुन पौर्णिमेला
पूर्वान्ही (सकाळी) भ. हरीचे (विष्णूचे) पूजन गंध, धूपदीप, पुष्प, नैवेद्य यांनी करावे, व जर त्या दिवशी पूर्वाषाढा
नक्षत्र असेल तर अन्नोदकाचे दान करुन एकभुक्त राहावे.
भद्रा
१९:०१
ते २९:४० पर्यंत विष्टी करण म्हणजेच भद्रा आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा
येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment