तिथी
|
पौष शुक्ल १४ (१९:५२)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२७:१७)
|
योग
|
ऐंद्र (२५:३५)
|
करण
|
गरज (९:२२), विष्टि (३०:२६)
|
ईशानव्रत
पौष शुक्ल
चतुर्दशीचे व्रत करून पुष्ययुक्त पौर्णिमा असेल तर पांढर्या वस्त्राने
आच्छादलेल्या वेदीवर चारी बाजूंनी अक्षतांचे पुंज ठेवावेत व मध्यावर एक ठेवावा.
त्यावर पूर्वेस विष्णू, पश्चिमेस ब्रह्मा, दक्षिणेस सूर्य व
उत्तरेस रुद्र यांची स्थापना करावी. मध्यावर ईशान स्थापन करून त्याची यथाविधी व
शास्त्रोक्त पूजा करावी आणि एक गौमिथुन (गाय व बैल) दान द्यावे. ब्राह्मणभोजन
घालावे. स्वतः गोमूत्र पिऊन उपवास करावा. याप्रमाणे पाच वर्षे केल्यास हे व्रत
पूर्ण होते. गोदानात एक विशेष हा की, पहिल्या वर्षापासून एक
बैल पण वाढत्या संख्येने दान द्यावीत. बैल गोर्हा ( न जुंपलेला) असावा. या
व्रताने सर्व प्रकारचे सुख मिळून लक्ष्मीची प्राप्ती होते.
विरूपाक्षपूजन
पौष शुक्ल
चतुर्दशीला विरूपक्षाची पूजा करावी व तदनुकूल उपकरण महोक्ष (मोठा बैल किंवा उंट)
याचे दान करावे. याप्रमाणे प्रत्येक शुक्ल चतुर्दशीला वर्षभर करण्याने
राक्षसादींचे भय राहत नाही व घरात सुखशांती नांदते.
भद्रा
१९:५२ नंतर ३०:२६ पर्यंत
भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment