💢मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !💢
तिथी
|
पौष कृष्ण २ (१२:४९)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (२२:५५)
|
योग
|
प्रिती (१६:२६)
|
करण
|
वणिज (२४:०९)
|
मकर संक्रांति
संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी
७:३८ ते दुपारी ३:३८ आहे.
कर्तव्य :
१) तिलमिश्रित उदकाने स्नान,
२) तिळाचे उटणे अंगास लावणे,
३) तिलहोम,
४) तिलतर्पण,
५) तिलभक्षण व
६) तिलदान
असा सहा प्रकारे तिळाचा
उपयोग करावा.
७:३८ वाजता रवि मकर राशीत
प्रवेश करत आहे. गरज करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार पुढीलप्रमाणे
संक्रांतिवर्णन :
वाहन हत्ती असून उपवाहन गाढव
आहे.
वस्त्र : तांबडे वस्त्र
परिधान केले आहे.
शस्त्र : हातात धनुष्य
घेतले आहे.
गोरोचनाचा टिळा लावलेला
आहे.
वयाने प्रौढ असून बसलेली
आहे.
वासाकरिता बेल घेतलेले
आहे.
दूध भक्षण करीत आहे.
पशु जाति आहे.
भूषणार्थ गोमेद रत्न धारण केली
आहे.
वारनाव राक्षसी असून
नक्षत्रनाव देखील राक्षसी आहे.
सामुदाय मुहूर्त १५ म्हणजे महर्घ
आहेत.
दक्षिणेकडून उत्तरेस जात
आहे व ईशान्य दिशेस पहात आहे.
पर्व काळात वर्ज कामे:
संक्रांतीच्या पर्व काळात
पुढील कामे करू नयेत
·
दात घासणे,
·
कठोर बोलणे,
·
वृक्ष/गवत तोडणे,
·
गाई-म्हशींची धार काढणे,
·
कामविषय सेवन
संक्रांतिपर्वकाळात
स्त्रियांनी करावयाची दाने:
·
नवे भांडे,
·
गाईला घास,
·
अन्न,
·
तिलपात्र,
·
गुळ तीळ,
·
सोने,
·
भूमि,
·
गाय,
·
वस्त्र,
·
घोडा
इत्यादि यथाशक्ति दाने
करावीत.
संकल्प :
देशकाल कथन करून
मम आत्मन: सकलपुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं
स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायुः महैश्वर्य
मन्गलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्तफ़ल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले
ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये |
असा संकल्प करून दानवस्तूचे
व ब्राह्मणाचे पूजन करून दान-दक्षिणा द्यावे.
जन्मनक्षत्रानुसार
संक्रांति फळ:
नक्षत्र
|
फळ
|
पुष्य, आश्लेषा, मघा
|
पंथा (प्रवास)
|
पूर्वा, उत्तरा, हस्त,
चित्रा, स्वाती, विशाखा
|
भोग (दु:ख)
|
अनुराधा, जेष्ठा, मूळ
|
व्यथा (आजार)
|
पूर्वाषाढा, उत्तराषाढा,
श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
|
वस्त्रम्
(वस्त्रप्राप्ती)
|
उत्तराभाद्रपदा, रेवती,
अश्विनी
|
हानि: (खर्च, नुकसान)
|
भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, आर्द्रा, पुनर्वसु
|
विपुलं धनं (मोठी
अर्थप्राप्ती)
|
धार्मिक अर्थ:
मकर संक्रांती
पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू
श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे.
पुराणातील
उत्तरायण:
महाभारतात कुरु
वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी
बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू
परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.
रवि मकर राशीत प्रवेश
७:३८ ला रवि मकर राशीत
प्रवेश करीत आहे. मकर राशीसाठी पुण्यकाल संक्रमणा नंतर ४० घटिका सांगितला आहे. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत
नाहीत. म्हणून पुण्यकाल ७:३८ ते १५:३८ आहे. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक
शुभ मानल्या आहेत.
सामुदायिक
मुहूर्त १५ म्हणजे महर्ग आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र
नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील
प्रमाणे:
·
१५ : महर्ग / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
तृतीया श्राद्ध
अपराण्ह काळी तृतीया तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण ३ आहे त्यांचे या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी
ते श्राद्ध करावे.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
भद्रा
२४:०९ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली
भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू
नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment