तिथी
|
पौष कृष्ण ११ (२४:२२)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (१३:५६)
|
योग
|
वृद्धि (१५:००)
|
करण
|
बव (११:१३)
|
षट्तिला एकादशी
पौष कृष्ण एकादशी दिवशीला प्रातःस्नान करून 'श्रीकृष्ण' या मंत्राचा ८, २८, १०८, किंवा १००० जप करावा.
उपवास करून रात्री जागरण करावे. हवन करावे. परमेश्वराचे पूजन करावे व
'सुब्रह्मण्य नमस्तेऽस्तु महापुरुष पूर्वज ।
गृहाणार्घ्यं मया
दत्तं लक्ष्म्यासह जगत्पते ॥'
या मंत्राने
अर्घ्य द्यावेत. ही ' षट्तिला एकादशी आहे. यात तिळाच्या जलाने स्नान, तिळाचे उटणे, तिळाचे हवन, तिळजलप्राशन व तीळ मिसळलेले पाणी दान करावे. तिलमिश्रित
मिष्टांन्ने भोजनात वापरावीत. म्हणजे सर्व पापांचा नाश होतो.
तिलदहीव्रत
हे तिथीव्रत आहे.
पौष कृष्ण एकादशीला हे व्रत करतात.
या दिवशी उपवास करतात. पुष्यनक्षत्राच्या दिवशी गाईचे शेण गोळा करून त्यात तीळ
मिसळून त्याच्या गोवर्या तयार करतात. मग त्या गोवर्यांचे अग्नीत हवन करतात.
विष्णू या व्रताची देवता आहे.
फल- सौंदर्य व इच्छित वस्तूची प्राप्ती.
रवि श्रवण नक्षत्र प्रवेश
२७:२६ ला रवि श्रवण
नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
घबाड
१३:५६ नंतर २४:२२ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराषाढा
चंद्र
नक्षत्र : जेष्ठा
तिथी: कृष्ण १० = १५ + ११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध योग
२४:२२ पर्यंत सोमवारी
एकादशी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
श्री निवृत्तीनाथ यात्रा, त्र्यंबक
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
येथील निवृत्तीनाथ यात्रा या दिवशी असते.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण ११ आहे त्यांचे या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी
ते श्राद्ध करावे.
अपराण्हकाली
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल तर त्याच दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी
तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment