तिथी
|
माघ शुक्ल ५ (२६:२०)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
उत्तराभाद्रपदा (२२:०६)
|
योग
|
शिव (७:३५), सिद्ध (२९:१५)
|
करण
|
बव (१५:०३)
|
वसंत पंचमी
माघ शुक्ल पंचमी दिवशी ( पूर्वविद्धा ) उत्तम अशा चौरंगावर वस्त्र अंथरावे.
त्यावर अक्षतांनी अष्टदल कमल काढावे. त्याच्या अग्रभागी गणेश, पृष्ठभागी वसंत
(म्हणजे गव्हाची पुंजी - रास ), लोंब्या जलपूर्ण घटात ठेवाव्यत. प्रथम गणेशपूजा व नंतर गव्हाच्या पुंजामध्ये
रतिमदनाची पूजा करावी. त्यावर अबीरादी घालून चित्रविचित्र करावे. नंतर
शुभा रति: प्रकर्तव्या वसंतोज्ज्वलभूषणा ।
नृत्यमाना शुभादेवी समस्ताभरणैर्णुता ॥
वीणावादनशीला च मदकर्पूरचर्चिता ॥
या मंत्राने रती आणि
कामदेवस्तु कर्तव्यो रूपेणाप्रतिमो भुवि ।
अष्टबाहु: स कर्तव्य: शंखपद्मविभूषण: ॥
चापबाणकरश्चैव मदादंचितलोचन: ।
रति: प्रीतिस्तथाशक्तिर्मदशक्तिस्तथोज्ज्वला ॥
चतस्त्रस्तस्य कर्तव्या: पत्नो रूपमनोहरा: ।
चत्वारस्य करास्तस्य कार्याभार्यास्तनोपग:
केतुश्च मकर: कार्य: पंचबाणमुखो महान् ॥
या मंत्राने कामदेवाचे ध्यान करावे. निरनिराळी फळे, फुले, पत्री आदी वाहून प्रार्थना करावी.
यामुळे गार्हस्थ्य-जीवन सुखमय होऊन प्रत्येक कार्यात उत्साह प्राप्त होतो.
रति व कामदेव पूजन
रति
कामदेवाचे पूजन करून गीतवादन, नृत्य इत्यादि करमणुकीचे कार्यक्रम करावेत. सामुहिक
आनंदोत्सव करावा.
घबाड
२६:२० नंतर घबाड
योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: श्रवण
चंद्र
नक्षत्र : रेवती
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि
अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त
मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन
वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त
प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर
३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment