तिथी
|
चैत्र शुक्ल ६ (१२:०३)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (१६:५७)
|
योग
|
प्रीति (८:२५), आयुष्मान (२९:४२)
|
करण
|
तैतिल(१२:०३), गरज (२३:०६)
|
कार्तिकस्वामीला दवणा वाहणे
या दिवशी कार्तिकस्वामीला दवणा वाहाव्यात.
कुमारव्रत व कार्तिकेय पुजन
चैत्र शुक्ल षष्ठीची देवता
कार्तिकस्वामी. या दिवशी मयूरवाहन कार्तिकस्वामींची मूर्ती करुन तिची पूजा करतात. या व्रतात
उपोषण व ब्राह्मीचा रस आणि तूप यांचे प्राशन करावयाचे असते.
फल-बुद्धिमत्ता, शास्त्र व पांडित्य यांचा लाभ.
अशोकष्ष्ठी
हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शुक्ल
षष्ठीस हे व्रत करतात.
या व्रतास षष्ठीदेवीचे पूजन करतात व अशोकाच्या सहा कळ्या व
सहा मुगाचे दाणे मिसळून दह्याबरोबर खातात.
फल- सुख व अपत्यप्राप्ती.
घबाड
१२:०३ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग
आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र
नक्षत्र : रोहिणी
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
यमघंट योग
१६:५७
पर्यंत शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– मघा
|
सोमवार
– विशाखा
|
मंगळवार
– आर्द्रा
|
बुधवार
– मूळ
|
गुरुवार
– कृत्तिका
|
शुक्रवार
– रोहिणी
|
शनिवार
– हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला
कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता
मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र
शुक्ल ७ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना
सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३
मुहूर्त सायंकाळ असतो.
अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही.
तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment