तिथी
|
चैत्र कृष्ण ८ (२६:०६)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (१७:३६)
|
योग
|
शिव (२७:५६)
|
करण
|
बालव (१२:४८), कौलाव (२६:०६)
|
कालाष्टमी
प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी
साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन
निषिद्ध मानले जाते.
जानकी व्रत
हे व्रत चैत्र कृष्ण अष्टमीला करतात. यात जनककन्या
जानकीची पूजा करतात. श्रीगुरु वसिष्ठांच्या आज्ञेवरुन श्रीरामचंद्राने समुद्रतटावर
असलेल्या तपोभूमीवर बसून हे व्रत केले होते. या व्रतात भाताचे हवन करावे व अनरशांचा
नैवेद्य दाखवावा. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता हे व्रत अवश्य करावे.
भैरव- शीतल अष्टमी
चैत्र कृष्णअष्टमी दिवशी शीतलादेवीचे
पूजन करतात. प्रथम थंड पाण्याने आणि नंतर दुधाने देवीला स्नान घालून भाताचा नैवेद्य
दाखवतात. अन्य उपचारही अर्पण करतात. त्याचप्रमाणे भैरवाचीही पूजा करतात. म्हणून या
व्रताला भैरव-शीतला अष्टमी असे म्हणतात.
अष्टमी श्राद्ध
अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र कृष्ण ८ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment