Monday, 19 March 2018

दिनविशेष - २८ मार्च २०१८




तिथी
 चैत्र शुक्ल १२ (२३:२४)
वार
 बुधवार
नक्षत्र
 आश्लेषा (१०:०१)
योग
 धृति (१५:१७)
करण
 बव (१२:२७), बालव (२३:२४)

तिथीवासर / हरीवासर

७:०० वाजेपर्यंत तिथीवासर आहे.
द्वादशीच्या प्रथम पादाला तिथीवासर असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.

मदनद्वादशी

हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शुक्ल द्वादशीला हे व्रत करतात. त्याचा विधी असा-
पाण्याने भरलेले एक भांडे घेऊन त्यात थोडे तांदूळ घालावेत व फळे ठेवावीत. नंतर त्या पात्रावर तांब्याचे तबक ठेवावे व त्यात गूळ, खाद्यपदार्थ आणि सोने घालावे. त्या तबकावर काम आणि रती यांच्या मूर्ती (चित्रे) काढाव्यात . त्यांच्यापुढे नैवेद्य म्हणून खाद्यपदार्थ ठेवावेत. नंतर गीतगायन करावे. दुसरे दिवशी ते जलपूर्ण पात्र ब्राह्मणाला दान देऊन त्याला भोजन घालावे. सांगतेच्या वेळी पुढीलप्रमाणे मदनाची प्रार्थना करावी-
प्रीयतामत्र भगवान् कामरूपी जनार्दनः ।
हृदये सर्वभूतानां य आनन्दोऽभिधीयते ॥
अर्थ : कामस्वरूपी जनार्दन सर्वाच्या हृदयामध्ये आनंदरूपाने राहतो व तो (या व्रताने) संतुष्ट होतो.
या वेळी व्रतधारी व्यक्तीने आळणी भोजन करावे.
या व्रताचा दुसरा पर्याय असा-
चैत्र शुक्ल द्वादशीला रात्री केवळ एक फळ खाऊन उघड्यावर झोपायचे. दुसर्‍या दिवशी उपवास करुन विष्णूची पूजा करावयाची. याप्रमाणे एक वर्ष व्रत केल्यावर उद्यापनाच्या वेळी एक गाय व काही वस्त्र दान द्यावयाची. तिळाचे हवन करावयाचे. दितीने पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले होते. या व्रताने पापनिवृत्ती होते.

विष्णूला दवणा वाहणे

या दिवशी श्री विष्णूंना दवणा वाहाव्यात.

घबाड

१०:०१ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्र : आश्लेषा
तिथी: शुक्ल १२ = १२   
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment