तिथी
|
चैत्र शुक्ल ४ (१५:२९)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
भरणी (१९:०१)
|
योग
|
वैधृति (१३:२७)
|
करण
|
विष्टि(१५:२९), बव (२६:४२)
|
विनायक चतुर्थी
विनायकी हे संकष्टीप्रमाणेच एक सर्व
कामनांना सिद्धिदायक असे व्रत आहे.
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' असे म्हणतात. आपल्या पंचागात विनायकी व संकष्टी असे उल्लेख असतात. संकष्टीप्रमाणेच
विनायकी हे व्रत आहे व ते गजाननाला प्रिय आहे. त्याचा पूजाविधी
संकष्टीप्रमाणेच असतो.
विनायक हे गणपतीचेच नाव आहे. या दिवशी चंद्रदर्शन
अथवा चंद्रपूजा याचा संबंध नसतो.
या दिवशी दोन वेळा उपवास करावयाचा असतो. दुसरे दिवशी पारणे
करतात. या व्रतसाधनाने सर्व विघ्ने, बाधा वगैरेचे निरसन होते व सर्व कामना परिपूर्ण होतात. गणपतीची
कृपा होते. महान सिद्धिदायक असे हे व्रत आहे. संकटकाळी पुष्कळ लोक आपल्या
संकटनाशनार्थ हे व्रत करतात व श्रीगजाननाला नवस बोलतात. या विनायकी ७, ११, २१, अशा ठरवून करावयाच्या
असतात.
या दिवशी सर्व पूजा नेहमीप्रमाणेच
अथवा संकष्टीप्रमाणेच अथवा संकष्टीप्रमाणेच मंत्र म्हणून करावी. उपचार
समर्पण करताना फक्त
'श्रीसिद्धिविनायकाय
नमः |
असा निर्देश करावा.
आश्रमव्रत
या व्रताचा प्रारंभ चैत्र शुक्लचतुर्थीपासून
होतो. तीन महिन्यांचा एक असे वर्षाचे चार भाग करुन प्रत्येक भागात अनुक्रमे
वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची पूजा करावयाची, असा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी एक वर्ष.
गणपतीला दवणा व लाडूचा नैवेद्य समर्पण करणे
या दिवशी श्रीगजाननाला दवणा वाहाव्यात व
लाडूचा नैवेद्य अर्पण करावा.
भद्रा
१५:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि
करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी
भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा
गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी
आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन
राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व
वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर
राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच
त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री
असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे
त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच
घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच
घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन
घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि
संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
चतुर्थी-पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्थी आणि पंचमी या
दोन्ही तिथी असल्यामुळे, ज्यांची
श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल ४ किंवा चैत्र शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना
सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३
मुहूर्त सायंकाळ असतो.
अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी
सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ
प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment