तिथी
|
चैत्र कृष्ण २ (१६:३५)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
स्वाती (३०:२२)
|
योग
|
हर्षण (२६:०९)
|
करण
|
गरज (१६:३५), वणिज (२८:३५)
|
ब्रह्मोत्सव
व्रज मंडळात साजरा होणारा एक उत्सव.
चैत्र कृष्ण द्वितीयेपासून एकादशीपर्यंत प्रामुख्याने वृंदावनातल्या रंगनाथमंदिरात
हा उत्सव होतो. रामानुज सांप्रादायातील हा सर्वात महत्वाचा उत्सव होय. उत्सवाच्या या
कालात रंगनाथाला निरनिराळी वाहने करतात व त्याची मिरवणूकही काढतात. वद्य नवमीला रथयात्रा
असते. या उत्सवात गावातील सर्व लोक बहुसंख्येने सामील होतात.
यमघंट योग
३०:२२ नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र
असल्यामुळे यमघंट होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार
– मघा
|
सोमवार
– विशाखा
|
मंगळवार
– आर्द्रा
|
बुधवार
– मूळ
|
गुरुवार
– कृत्तिका
|
शुक्रवार
– रोहिणी
|
शनिवार
– हस्त
|
|
यमघंट योगावर जन्म झाल्यास
बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता
मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.
याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५,
गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर
पुढे) देखील यमघंट योग होतो.
भद्रा
२८:३५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण
आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान
शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा
नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली
व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र
असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र
असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे
फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास
तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे
चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून
विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत
निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित
कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय
होण्याची शक्यता असते.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र कृष्ण २ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment