तिथी
|
चैत्र शुक्ल १४ (१९:३५)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (७:२७), उत्तराफाल्गुनी
(३०:३०)
|
योग
|
गंड (९:४७)
|
करण
|
गरज (८:२७), वणिज (१९:३५)
|
गुडफ्रायडे
गूड फ्रायडे म्हणजेच पवित्र शुक्रवार
/ चांगला शुक्रवार / काळा शुक्रवार किंवा महा शुक्रवार. हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या
आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू
ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून
मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा
होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक
चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
ख्रिश्चन सण इंग्रजी तारखे प्रमाणे
असतात मात्र या सणाचा संबंध पौर्णिमेशी आहे. २२ मार्च नंतर येणाऱ्या
पौर्णिमे नंतरचा रविवार हा ईस्टर डे आणि इस्टरडे च्या आधीचा शुक्रवार हा गुडफ्रायडे
असतो म्हणून त्याची तारीख आपलया सणा प्रमाणे दरवर्षी वेगळी असते !
(२१/२२ मार्च
विषुवदिन म्हणतात. या दिवशी दिनमान आणि रात्रीमान
समान असते.)
नृसिंह दोलोत्सव
श्री नृसिंहाची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना
करावी. ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.
दमनचतुर्दशी
हे एक व्रत होय. चैत्र किंवा श्रावण
महिन्याच्या शुक्लचतुर्दशीला हे व्रत करतात. एकवीरा व भैरव या या व्रताच्या मुख्य देवता
होत. या दोन देवतांच्या बरोबरच रात्री संचार करणार्या इतरही शक्तिदेवता असतात. त्यांच्याही
प्रीत्यर्थ हे व्रत करावयाचे असते. म्हणून या व्रताची पूजा रात्री करतात. त्या पूजेत
शिवाला दुधांचा व उसाच्या रसाचा अभिषेक करतात. दवणा, बेल व मरवा यांनी देवाची पूजा बांधतात. नैवेद्यानंतर तांदळाच्या पिठाने पाच
किंवा नऊ दिवे करतात व ते काशाच्या पात्रात ठेवून देवाची आरती करतात. शक्य असल्यास
रात्री देवाची रथयात्रा काढतात. शेवटी शिवभक्तांची पूजा करून भोजन घालतात.
फल- पुण्य
व सौख्य यांची प्राप्ती.
मदन चतुर्दशी
हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शुक्लचतुर्दशीला
मदनचतुर्दशी म्हणतात. हिला मदनभंजी असेही नाव आहे. या दिवशी मदनाची पूजा करतात. त्यास
संतुष्ट करण्यासाठी गायन, वादन, कमोत्तेजक बोलणे असे प्रकार करतात.
फल- इच्छाप्राप्ती.
हनुमान जयंतीचा उपवास
हनुमान जयंतीचा उपवास या दिवशी करावा.
भद्रा
१९:३५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण
आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान
शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा
नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली
व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध
व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र
असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र
असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र
असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे
फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास
तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे
चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून
विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत
निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका
भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग,
अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित
कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा
मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय
होण्याची शक्यता असते.
चतुर्दशी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र शुक्ल १४ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे
महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त
सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ
बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment