Monday, 31 August 2015

दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण कृ. २ (१६:५०)
वार
 सोमवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (९:५५)
योग
 धृति (९:५०), शूल (२९:५१)
करण
 तैतिल (६:३८), वणिज (२७:०५)

श्रावणी सोमवार

दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.

शिवमुष्टी

मूग
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.


रविचा पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रवेश

रवि ८:२४ ला पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रविचे नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा

वाहन उंदीर

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रविचे नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
अंतर : १५
१५ ला ९ ने भागले असता बाकी राहते ६. म्हणून वाहन उंदीर आहे. याचाच अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना अल्प पर्जन्यवृष्टी होईल.

नक्षत्रसंज्ञा : सूर्य-चंद्र

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रविचे नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा = चंद्र नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना पाऊस पडेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री-पुरुष

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रविचे नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा = पुरुष नक्षत्र
एक स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्रआहे. त्यामुळे रवि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

भद्रा

२७:०५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण कृ. १ (२०:२७)
वार
 रविवार
नक्षत्र
 शततारका (१२:४५)
योग
 सुकर्मा (१३:५६)
करण
 बालव (१०:१७)

गोकुळ अष्टमी नवरात्र

कित्येक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण-समाजात हे नवरात्र असते. श्रावण व. प्रतिपदेला सुरू होऊन ते नवमीला पारणे झाल्यावर संपते. या नवरात्रात भागवत सप्ताहाचे विशेष महत्त्व आहे. या अवधीत संपूर्ण भागवत वाचणे, न जमल्यास निदान त्याचा दशम स्कंध तरी वाचतात किंवा श्रवण करतात. याशिवाय अखंड नामसप्ताह, कीर्तन व भंडारा हे कार्यक्रम या दिवसांत असतात. लक्ष्मीनारायण, गोपालकृष्ण, मुरलीधर, विठ्ठल इ. देवांच्या मंदिरात हे नवरात्र साजरे होते. शेवटी गोपालकाला होतो.

धनावाप्ती व्रत

एक काम्य व्रत. श्रावण वद्य प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ करतात. व्रतावधी एक महिना. विष्णू व संकर्षण यांची निळ्या कमळांनी पूजा करणे, व भाद्रपद पौर्णिमेपूर्वी तीन दिवस उपवास करणे असा याच विधी आहे. उद्यापनाच्या वेळी गोप्रदान करतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला व्रतारंभ करणे, हा याचा दुसरा पर्याय आहे. या पर्यायात विष्णू, पृथ्वी, आकाश व ब्रह्मा यांची अनुक्रमे प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत पूजा करतात. व्रतावधी एक वर्ष -
फल - धन, सौंदर्य व सुख यांची प्राप्ती.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

श्रावणी रविवार

दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 28 August 2015

दिनविशेष - २९ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण पौर्णिमा (२४:०५)
वार
 शनिवार
नक्षत्र
 धनिष्ठा (१५:३२)
योग
 अतिगंड (१८:००)
करण
 विष्टी (१३:५२)

नारळी पौर्णिमा

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

रक्षाबंधन

हे व्रत पौर्णिमेला करतात. या दिवशी परान्ह व्यापिनी तिथी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी. जर त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य करावी. भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वर्ज्य ठरविल्या आहेत. कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते. त्या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून वेदोक्‍त मंत्राने रक्षाबंधन, पितृतर्पण, आणि ऋषिपूजन करावे. शूद्राने मंत्राशिवाय स्नानदानादी करावे. रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे. त्यात तीळ, सुवर्ण, केशर, चंदन, अक्षता आणी दूर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी (देवघरात) कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी. नंतर राजा, मंत्री, वैश्‍य अगर शिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात
'येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महबल: ।
तेन त्वां अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने बांधावा. या बंधनामुळे वर्षभर पुत्रपौत्रादी सर्व सुखी राहतात.

शुक्लयजु:तैत्तिरीय श्रावणी


कोकिळाव्रत समाप्ती

दिनांक ३० जुलै २०१५ रोजी सुरु झालेल्या कोकिळा व्रताची समाप्ती होत आहे.

श्यामाकाग्रयण


हयग्रीवोत्पत्ति


कुलधर्म

जुने जानवे टाकुन नवीन जानवे घालणे, पुन्हा नव्याने अध्यनन करणे, हा श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा सांघिक स्वरुपाचा कुलाचार आहे. त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचे पुजन होम - हवन विधी करतात. नागपंचमीला हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी लोकांची नारळी पौर्णिमेला यजृर्वद्याची भाद्रपदात हस्त नक्षत्रावर सामवेद्यांची व भाद्रपद पौर्णिमेला अथर्ववेद्यांची श्रावणी असते.

श्रवणकर्म / श्रवणपूजन

श्रावण पौर्णिमेदिवशीच राजा दशरथाच्या हातून वन्यपशू समजून नेत्रहीन मातापित्यांचा एकुलत एक पुत्र श्रावण मारला गेला. त्यावेळी राजा दशरथाने त्यांचे सांत्वन केले व आपल्या हातून चुकीने झालेल्या हत्येचे परिमार्जन व्हावे म्हणून श्रावणी पौर्णिमे दिवशी 'श्रवणपूजे' चा सर्वत्र प्रसार केला. तेव्हापासून बहुतेक सर्व श्रद्धाळू जन त्या दिवशी 'श्रवणपूजा' करून त्यालाच रक्षा अर्पण करतात. (हे व्रत नाही.)

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

ऋषितपर्ण

श्रावण शु. १५ ला सर्व ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी स्वाध्यायी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आदी कोणत्याही आश्रमाचे विद्यार्थी आपपल्या वेद, कार्य आणि क्रियेच्या अनुकूलतेप्रमाणे करीत असतात. त्याचा विधी थोडक्यात असा-
नदीच्या किनारी जाऊन यथाविधी स्नान करून कुशनिर्मित ऋषींची स्थापना करावी व त्यांचे पूजन, तर्पण, विसर्जन करून रक्षोपोटलिका करून त्याचे मार्जन करावे. त्यानंतर पुढील वर्षीचा अध्ययनक्रम निश्‍चित करून सायंकाळी व्रतसमाप्ती करावी. यामध्ये उपाकर्मपद्धतीनुसार अनेक कर्मे असतात. ती विद्वानांना विचारून करावीत. ही कृत्ये चातुर्मासात आचरावयाची असतात. या काळात नद्या रजस्वला असतात, असे मानतात. तरीही
'उपकर्मणी चोत्सर्गे प्रेतस्नाने तथैवच ।
चंद्रसूयग्रहेचैव रजोदोषो न विद्यते।'
या वसिष्ठवचनानुसार उपाकर्म दोष होत नाही.

भद्रा

१३:५२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

श्रावणी शनिवार


दर शनिवारी नरसिंह-पिंपळ-शनि-मारुति पूजन करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट