तिथी
|
निज आषाढ कृ ३ (६:४३), निज आषाढ कृ
४ (२७:४१)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (२४:३९)
|
योग
|
अतिगंड (२४:०३)
|
करण
|
बव (१७:१०)
|
संकष्टी चतुर्थी
(पुणे चंद्रोदय : २१:२९)
ही चतुर्थी विघ्नहर्त्याची म्हणून म्हणतात. या दिवशी सर्व दिवसभर उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर मधयुक्त भोजन करावे. ब्राह्मणास मधाचे दान करावे
व त्यास भोजन घालून मग आपण भोजन करावे. यायोगे जो चालतो त्याची सकल अभिष्टे साधतात व तो प्रसाद
पावतो.
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर
महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी
असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर
गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी
तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती
प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी
चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या
दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी
घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची
गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी
पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः ।'
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प
करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या
संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व
नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून
पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान
योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे
पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच
चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या
व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक
सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा
आहे.
रविचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश
१४:४७ ला रवि आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत
आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य
काळ समाजाला जातो.
रवि
चे नक्षत्र :
आश्लेषा
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
वाहन – गाढव
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रविचे
नक्षत्र : आश्लेषा
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा
अंतर
: १७
१७
ला ९ ने भागले असता बाकी राहते ८. म्हणून वाहन गाढव आहे. याचाच अर्थ रवि आश्लेषा
नक्षत्रात असताना अल्पवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : चंद्र चंद्र
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा,
स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू,
पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वाभाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार
नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रविचे
नक्षत्र : आश्लेषा = चंद्र नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा =
चंद्र नक्षत्र
दोन्ही चंद्र नक्षत्र आहेत. याचा अर्थ रवि आश्लेषा नक्षत्रात असताना फारसा पाऊस पडणार नाही.
स्त्री-पुरुष-नपुंसक
नक्षत्रे : स्त्री पुरुष
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रविचे
नक्षत्र : आश्लेषा = स्त्री
नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा =
पुरुष नक्षत्र
एक
स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्रआहे. याचा अर्थ रवि आश्लेषा नक्षत्रात
असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
स्वर्णगौरीव्रत
हे व्रत आषाढ कृ तृतीये दिवशी
करतात. त्या दिवशी प्रातःस्नान करुन स्वच्छ जागेवरील माती आणून त्यापासून गौरीची
मूर्ती करतात. त्याशेजारी सूत अगर रेशमी दोरा (१६ सुतांचा तारांचा) करून व त्याला
१६ गाठी देऊन स्थापन करावा. नंतर गौरीचे ध्यानवाहनादी षोडशोपचारे पूजन करून तो
तातू (दोरा) उजव्या हातात बांधावा व व्रत करावे. याप्रमाणे १६ वर्षे केल्यावर
त्याचे उद्यापन करावे. त्यावेळी एका चौरंगावर अष्टदल कमल काढून त्यावर कलश स्थापन
करावा आणि त्यावर शिवगौरीची मूर्ती प्रतिष्ठापन करुन त्याची यथाविधी पूजा करुन
प्रार्थना करावी. सोन्याचा १६ ग्रंथीयुक्त तातू करुन त्याची पूजा करावी.
'ॐ शिवाय नमः स्वाहा' या
हवनमंत्राने हवन करावे व १६
काष्ठापात्रांत सोळा प्रकारची फळे व पक्वान्ने घालून १६ ब्राह्मणांना दान करावीत.
त्याचप्रमाणे गोदान, अन्नदान , शय्यादान व भूयसी दक्षिणा देउन १६ दांपत्ये भोजन घालून, मग स्वतः जेवण करावे.
घबाड
०६:४३ नंतर १४:४७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही
धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी
मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पुष्य
चंद्र नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा
तिथी: १५+४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+४ = १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू
७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
घबाड
२४:३९ नंतर २७:४१ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही
धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी
मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आश्लेषा
चंद्र नक्षत्र : उत्तराभाद्रपदा
तिथी: १५+४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १५+४ = १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू
७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.
भद्रा
६:४३ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
क्षयतिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ
कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
कज्जली (काजळी) तृतीया
:
यंदा हा योग होत नसला तरीही आषाढ कृष्ण तृतीयेला करायचे हे व्रत आहे.
आषाढ कृ तृतीयेदिवशी श्रवण नक्षत्र असेल, तर विष्णूची पूजा करावी व व्रत
करावे. या दिवशी पराविद्धा तिथी ग्राह्य धरतात.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment