तिथी
|
श्रावण शु ५ (अहोरात्र)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
हस्त (१३:२२)
|
योग
|
साध्य (९:४०)
|
करण
|
बव (१९:११)
|
नागपंचमी
पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या
अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने
सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी
देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच
देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण
देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून
प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि
मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला.
तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या
पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा
प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत
नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत
असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना
करतात.
नागपंचमीची कथा
एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते.
त्या शेतकर्याला दोन मुले व एक मुलगी
होती. एकदा शेतात नांगर
फिरवत असताना शेतकर्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या
पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला.
त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्याविषयी
सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा
फायदा घेऊन नागीण शेतकर्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.
दुसर्या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
दुसर्या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
नवनागपूजन
१)
अनंत
२)
वासुकी
३)
शेष
४)
पद्मनाभ
५)
कंबल
६)
शंखपाल
७)
धृतराष्ट्र
८)
तक्षक
९)
काल
वरील नऊ नागांचे चित्र पाटावर किंवा भिंतीवर रक्तचंदनाने
काढून किंवा छापील चित्राचे पूजन करावे.
श्रावणी
ऋक् शुक्लयजु: हिरण्यकेशी श्रवणी
श्रावणी बुधवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.
बुध - बृहस्पतींची
कहाणी
ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा
होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामाभाचे
भिक्षेला जात. राजाच्या सुना “आमचे हात रिकामे नाहीत” म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांस दरिद्र आलं. सर्वांचे हात
रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणं भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, “असतं तर दिलं असतं.
आमचे हात रिकामे झाले”. सर्वांत धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला. होतं तेव्हां दिलं नाही, आता नाही म्हणून नाही.
ब्राह्मण विन्मुख जातात.
ती त्यांच्या पाया पडली. त्यांना
सांगू लागली, “आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी
होऊ, असा काही उपाय सांगा,” ते म्हणाले, “श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती
प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुली काढावी. संपत्ति पाहिजे
असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा
सत्कार करावा. म्हणजे इच्छित हेतु पूर्ण होतात.” त्याप्रमाणे ती करूं लागली. एके
दिवशी तिला स्वप्न पडलं, “ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढते आहे.” ही गोष्ट तिनं आपल्या जावांना
सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली.
इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला
गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन
करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व
तिला नगरात फिरविलं, “ज्याच्या गळ्यांत माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल,” अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या
बाईच्या नवर्याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा
हत्तीण फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यांत माळ घातली. याप्रमाणं तीनदां झालं. पुढं
त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न
करून देशोधडीस लागल्याची खबर समजली.
मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम
सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले, तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं
बुध-बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा
केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत
चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते
पाहिलं. त्याचा सन्मान केला. मुलंबाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले.
जशी त्यांवर बुध-बृस्पतींनी कृपा
केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत.
ही साठां उत्तराची कहाणी पांचा
उत्तरी सुफळ संपूर्ण.
वृद्धितिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment