Tuesday, 31 January 2017

दिनविशेष - १ फेब्रुवारी २०१७



तिथी
 माघ शुक्ल ५ (२६:२०)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (२२:०६)
योग
 शिव (७:३५), सिद्ध (२९:१५)
करण
 बव (१५:०३)


वसंत पंचमी

माघ शुक्ल पंचमी दिवशी ( पूर्वविद्धा ) उत्तम अशा चौरंगावर वस्त्र अंथरावे. त्यावर अक्षतांनी अष्टदल कमल काढावे. त्याच्या अग्रभागी गणेश, पृष्ठभागी वसंत (म्हणजे गव्हाची पुंजी - रास ), लोंब्या जलपूर्ण घटात ठेवाव्यत. प्रथम गणेशपूजा व नंतर गव्हाच्या पुंजामध्ये रतिमदनाची पूजा करावी. त्यावर अबीरादी घालून चित्रविचित्र करावे. नंतर

शुभा रति: प्रकर्तव्या वसंतोज्ज्वलभूषणा ।
नृत्यमाना शुभादेवी समस्ताभरणैर्णुता ॥
वीणावादनशीला च मदकर्पूरचर्चिता ॥
या मंत्राने रती आणि

कामदेवस्तु कर्तव्यो रूपेणाप्रतिमो भुवि ।
अष्टबाहु: स कर्तव्य: शंखपद्मविभूषण: ॥
चापबाणकरश्‍चैव मदादंचितलोचन: ।
रति: प्रीतिस्तथाशक्‍तिर्मदशक्‍तिस्तथोज्ज्वला ॥
चतस्त्रस्तस्य कर्तव्या: पत्‍नो रूपमनोहरा: ।
चत्वारस्य करास्तस्य कार्याभार्यास्तनोपग:
केतुश्‍च मकर: कार्य: पंचबाणमुखो महान् ॥
या मंत्राने कामदेवाचे ध्यान करावे. निरनिराळी फळे, फुले, पत्री आदी वाहून प्रार्थना करावी. यामुळे गार्हस्थ्य-जीवन सुखमय होऊन प्रत्येक कार्यात उत्साह प्राप्त होतो.

रति व कामदेव पूजन

रति कामदेवाचे पूजन करून गीतवादन, नृत्य इत्यादि करमणुकीचे कार्यक्रम करावेत. सामुहिक आनंदोत्सव करावा.

घबाड

२६:२० नंतर  घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: श्रवण
चंद्र नक्षत्र : रेवती
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

पंचमी श्राद्ध

अपराण्ह काळी पंचमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ शुक्ल ५ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 30 January 2017

दिनविशेष - ३१ जानेवारी – २०१७




तिथी
 माघ शुक्ल ४ (२७:४१)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (२२:४५)
योग
 परिघ (९:४१)
करण
 वणिज (१६:१५)

श्री गणेश जयंती

माघ शुक्ल चतुर्थी ही श्री गणेश जयंतीम्हणून साजरी केली जाते.  या दिवशी मध्यान्ही श्री गणेशाचा जन्मोत्सव असतो. तिळाच्या लाडवाचा नैवेद्य समर्पण करावा.

विनायक चतुर्थी

या चतुर्थीस 'विनायकी चतुर्थी' म्हणतात. असुर नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार धरला म्हणुन ही विनायकी प्रसिद्ध आहे. शिवाय या चतुर्थीला 'ढुंढिराज चतुर्थी' असेही म्हणतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे. या दिवशी उपवास करून श्रद्धेने गणेशाची पूजा करावी; आणि पंचमीला तिळाचे जेवण करावे, अशा तर्‍हेने हे व्रत केल्यास मनुष्य निर्विघ्न व सुखी होतो.

'गं स्वाहा'
हा मूळ मंत्र आहे.

'गां नम:'
ने ह्रदयादीन्यास करावा.

'आगेच्छोल्काय'
म्हणून गणेशाला आवाहन करावे आणि

'गच्छोल्काय'
म्हणून विसर्जन करावे. गंध इ. उपचारांनी विधिपूर्वक गणपतीचे पूजन करूज त्यास लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा.

नंतर आचमन, नमस्कार आणि प्रदक्षिणा इ. नंतर या गणेशगायत्री मंत्राचा जप करावा :-
'ॐ महोल्काय विद्‌महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नोदन्ति प्रचोदयात् ॥' ( अग्निपुराण )

याच तिथीस गौरीव्रतही केले जाते. गणांसह गौरीची पूजा करतात. कुंकू इ. साहित्यांनी भगवती गौरीची पूजा करतात. आपल्या सुख-सौभाग्यासाठी सुवासिनी व ब्राह्मण यांची पूजा करावी. त्यानंतर प्रसन्न मनाने स्वबांधवांसह स्वत: भोजन करावे. या गौरीव्रताच्या प्रभावाने सौभाग्य व आरोग्य यांची प्राप्ती होते.
या पुण्यमय तिथीला स्नान, दान, जप व होम इ. शुभ कर्मांनी गजाननाच्या कृपेने सहस्रपट कामे यशस्वी होतात. या दिवशी नक्‍तव्रत करून जे धुंडिराजाची मध्यान्ही व सायंकाळी पूजा करतील त्यांना सर्व देवांच्या पूजेचे फल मिळते व ते सर्वत्र विजयी होऊन अंती गणेशलोकी जातील.

या दिवशी कोणी कोणी 'नक्‍त व्रत' पाळून ढुंढिराजाची पूजा करतात व त्यास तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. जे मांत्रिक या दिवशी तीळ व तूप यांनी हवन करतात, त्यांचे मंत्र सिद्ध होतात. या व्रताचे माहात्म्य फार आहे.

सुख चतुर्थी (अंगारक चतुर्थी)

जर माघ शुक्ल चतुर्थीस मंगळवार असेल तर त्या दिवशी प्रात:काळी स्नान झाल्यावर प्रथम अंगाला माती लावून नाहावे. मग लाल वस्त्र लाल परिधान करावे. पद्मरागिणी हातात घालावा आणि उत्तरेकडे तोंड करून बसून 'अग्निमूर्द्धात' या मंत्राचा जप करावा.
जर जानवे नसेल तर त्याने 'अंगारकाय भौमाय नम:' या मंत्राचा जप करावा.
नंतर जमीन शेणाने सारवून त्यावर लाल चंदनाने अष्टदल काढावॆ. त्यांच्या पूर्वादी चारी दिशांना भक्ष्य भोजन आणि भात घालून चार भांडी ठेवावीत. त्याची पूजा करावी. कपिला गाय आणि लाल रंगाचा बैल दान द्यावीत. बरोबर शय्यादान केल्यास सहस्त्रपट फल प्राप्त होते.

माघ शुक्ल चतुर्थीस जर मंगळवार असेल तर
'सुमंतुरूवचन चतुर्थी तु चतुर्थी तु यदाङ्गारकसंयुता ।
चतुर्थ्यां तु चतुर्थ्यां तु विधानं श्रृणु यादृशाम् ॥'
प्रमाणे लाल अक्षता, गंध, फुले व नैवेद्य याने श्रीगणेशाची पूजा करावी व याप्रमाणे चतुर्थ (चतुर्थ = चौथी चौर्थी) व चतुर्थी (चतुर्थी = माघ, वैशाख, भाद्रपद व पौष) अशा चतुर्थ्याचे एक वर्षपर्यंत व्रत करावे म्हणजे सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, मात्र प्रत्येक चतुर्थीला मंगळवार असावा.

गणेशव्रत

माघ शुक्ल पूर्वविद्धा चतुर्थी दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर
'ममाखिलाभिलषितकार्यसिद्धिकामनया गणेशव्रतं करिष्ये ।'
या मंत्राने संकल्प करावा आणि लाल वेदीवर लाल वस्त्र अंथरून व स्वत: लाल वस्त्र परिधान करून लाल पूजोपचारांनी गणपतीची यथाविधी व शास्त्रोक्त पूजा करावी व ओली हळकुंडे गूळ, साखर व तूप यांत मिसळून नैवेद्य दाखवावा. रात्री नक्‍त करून संपूर्ण अभीष्ट प्राप्त करून घ्यावे.

तिलकुंद चतुर्थी/ तिलकचतुर्थी

माघ शुक्ल चतुर्थीला हे नाव आहे. या दिवशी नक्‍तव्रत, गणपतीची पूजा करतात. तिल व आज्य या द्रव्यांनी हवन करतात. तिळामिश्रित गुळाच्या लाडवाचे सेवन करतात. रात्री जागरणही करतात. हिला 'कुंद चतुर्थी' असेही नाव आहे. या दिवशी कुंदाच्या फुलांनी सदाशिवाची पूजा करून जो नक्‍त भोजन करतो, त्याला लक्ष्मी प्राप्त होते.

वरदा चतुर्थी  / (शिवपूजन)

माघ शुक्ल चतुर्थीस कुंदाच्या फुलांनी शिवपूजन करावे. श्रीप्राप्ती होते. या दिवशी गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंनी पार्वतीचे पूजन करावे व गूळ, आले, लवण, पालक ( भाजी - मुळा ) आणि खीर यांचा बली देऊन ब्राह्मणांना अर्पण करावा व भोजन द्यावे.

शांतिचतुर्थी

माघ शुक्ल चतुर्थीला गणेशपूजा करून तुपात तळलेले मोदक (अपूप ) आणि मिठाची पक्वान्ने देऊन गुरुदेवाची पूजा करावी व गूळ, मीठ आणि तूप देऊन सर्व प्रकारची शांती प्राप्त करून घ्यावी.

कुंद चतुर्थी /कुण्ड चतुर्थी

माघ शुक्ल चतुर्थी दिवशी उपास करून देवीची पूजा करावी. अनेक उपचारांनी पुजुन सर्व प्रकारची नैवेद्यसामग्री सुपातून अगर मातीच्या भांड्यातून घालून ब्राह्मणाला दिल्यास संतती आणि सौभाग्य प्राप्त होतात.

गौरी चतुर्थी

एक व्रत. माघ शुक्ल चतुर्थीला सर्वांनी, विशेषत: स्त्रियांनी कुंदपुष्पे वाहून गौरीची पूजा करावी. विद्वान ब्राह्मणाचा सन्मान करावा. असा याचा विधी आहे.
फल - संतती व सौभाग्य यांची प्राप्ती.

ढुण्ढिपूजा

माघ शुक्ल चतुर्थी दिवशी नक्‍तव्रत आचरून काशीवासी ढुण्ढीराजाचे पूजन करावे आणि तिलसाखरेचे मोदक अर्पण करून तिळांच्या आहुती द्याव्यात. रात्री एकभुक्‍त राहून जागरण करावे म्हणजे त्याने संपूर्ण पापे नाहिशी होतात.

यमव्रत

माघ शुक्ल चतुर्थी दिवशी जर शनिवार आणि भरणी नक्षत्र असेल तर त्या दिवशी यमाचे पूजन करावे व तन्निमित्त व्रत करावे, याने यमभयाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होते.


दग्ध योग

२७:४१ नंतर मंगळवारी पंचमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा

१६:१५ नंतर २७:४१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


चतुर्थी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्थी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी माघ शुक्ल ४ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट