तिथी
|
कार्तिक शुद्ध ५ (२६:२३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (२०:०८)
|
योग
|
शूल (२६:०३)
|
करण
|
बव (१४:३३)
|
पांडव पंचमी
पांडवांनी
ईश्वराच्या (श्रीकृष्णाच्या) आदेशानुसार कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडवांसारखे पुत्र घरात
जन्माला यावेत आणि पुत्रांत असलेल्या गुणांची वृद्धी व्हावी, यांसाठी पांडवांची पूजा करतात.
गायीच्या
शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. पुढील प्रार्थना आणि
श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा.
‘हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे
तुझ्या आदेशाचे पालन करून पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, त्याप्रमाणे आम्हाला समाजातील दुर्जन आणि वाईट शक्ती
यांच्याविरुद्ध युद्ध करून त्यांना नष्ट करता येऊ दे. पांडवांनी जसे तुझे
आज्ञापालन केले, त्याप्रमाणे आम्हाला गुरूंचे आज्ञापालन करून
तुझ्यासारखे गुण आमच्यात आणता येऊ देत. आम्हा सर्वांवर तुझी कृपा सतत असू दे.
ईश्वरी राज्य आणण्यासाठी आमची धडपड असू दे.’
कड पंचमी
जया पंचमी किंवा जयाव्रत
कार्तिक शुद्ध
पंचमीस हे व्रत करतात. गंगादी तीर्थांचे स्मरण करून तिलोद्वर्तन करून स्नान करून
शुद्धासनी बसून भगवान 'हरी' व त्याच्या डाव्या बाजूस 'जया' ची स्थापना करावी. गंध व विविध फुलांनी
प्रेमपूर्वक त्यांची पूजा करून हरीच्या विविध अंगांची (उदा पावले, गुडघे, छाती, पोट,
वक्ष:स्थळ, कंठ,
मुख, मस्तक इ. ) पूजा पद्मनाभ, नरसिंह, मन्मथ, दामोदर इ. नावांनी करावी.
'जयाय जयरूपाय जय गोविंदरूपिणे ।
जय दामोदरायेऽति
जय सर्व नमोऽस्तु ते ॥'
या मंत्राने
अर्घ्य द्यावे व सात तर्हेची धान्ये टोपलीत घालून त्यावर लालवस्त्र झाकावे व
'यथा वेणुफलं दृष्ट्वा तुष्यते मधुसूदन: ।
तथा मेहस्तु शुभं
सर्वं वेणुपात्र प्रदानत: ॥
या मंत्राने
टोपलीतील धान्ये ब्राह्मणांना द्यावीत. मग एका वस्त्रात गंधाक्षता, फुले, मोहर्या व दूर्वा घालून 'राखी' तयार करून
'येन बद्धो बलोराजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन
त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने
रक्षाबंधन करावे. हे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येसारख्या पापापासून मुक्ती मिळते व
सर्व सुखांचा लाभ होतो.
रविचा वृश्चिक राशीत प्रवेश
२४:०३ ला रवि वृश्चिक राशीत
प्रवेश करत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, वृश्चिक राशीसाठी संक्रमणापूर्वी पूर्वी
१६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात
स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १२:२३ ते सूर्यास्त असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
महालय समाप्ती
भाद्रपद वद्य प्रतिपदेला
सुरु झालेला महालय सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेपर्यंत असतो. रवी वृश्चिक राशीत
प्रवेश करत असल्यामुळे महालयाची समाप्ती होत आहे.
मृत्यू योग
२०:०८ नंतर सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
घबाड
२६:२३ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: विशाखा
चंद्र
नक्षत्र : उत्तराषाढा
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८+६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
पांडव पंचमिला पांडव वनवास संपवून परत आले
ReplyDeleteमहाभारत युध्द मार्गशीष महिन्यात कृतिका नक्षत्रावर शुक्ल पक्षात सुरु झाले ते 18 दिवस चालले होते
युद्धच्या सुरुवातीला अर्जुन विषाद योग प्रसंगी भगवान श्रीकृष्णानी गीता उपदेश केला तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी होता