तिथी
|
कार्तिक शुद्ध १ (२४:४६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
विशाखा (१५:४२)
|
योग
|
शोभन (२९:३१)
|
करण
|
किंस्तुघ्न (१२:०५)
|
दिवाळी पाडवा
साडेतीन मुहूर्तापैकी एक
दिवस म्हणून हा सर्व सामान्य कामास शुभ आहे.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध
प्रतिपदा विक्रम संवत्सराचा आरंभ-दिवस. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी मुहुर्त आहे.
प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. ह्या दिवशी सार्वजनिक
लोकोपयोगी रस्ते, शाळा, नदीचे घाट, पूल,
तलाव, वाचनालय इ. कार्यास प्रारंभ करावा.
अभ्यंगस्नान
शौचमुखमार्जन
झाल्यावर-
'यमलोकदर्शनाभावकामोऽहमभ्यंगस्नान करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावून अभ्यंगस्नान करावे.
वहीपूजन
नव्या वहीची पूजा करून
त्यात जमा खर्च लिहिण्यास सुरवात करावी. या दिवशी व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या वह्या, शाईची दौत, लेखनसाहित्य यांची पूजा करतात, काही व्यापारी या
दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात.
पतीस ओवाळणे
सौभाग्यवती
स्त्रियांनी आपल्या पतीस ओवाळावे. रात्री बळीची पूजा करून त्यास दीपदान करावे.
गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. ह्या दिवशी रात्री खेळ, गायन वगैरेंचा कार्यक्रम करून जागरण करावे.
अन्नकूट
अन्नाच्या ढीगावर
गोपालकृष्ण ठेवून त्याची पूजा करावी. गाय म्हणजे लक्ष्मी आणि खोंड म्हणजे कुबेर
समजून त्यांची पूजा करावी.
कार्तिक शुद्ध
प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांखेरीज यथाशक्ती इतर पदार्थ, जसे - भात, आमटी, कढी,
भाजी इ. कच्चे; पुरी, खीर; शिरा इ. पक्के; लाडू, पेढे, बर्फी, जिलबी इ. गोड; केळी; संत्री, डाळींबे, सीताफळे इ. फळे; वांगे, मुळा, कांद्याच्या पाती इ.
भाज्या; चटणी, मुरंबा, लोणचे इ. तिखट-मिठाचे पदार्थ- असावेत व त्यांचा नैवेद्य
श्रीकृष्णास दाखवावा. याखेरीज इतर काही पदार्थ तयार करून त्यांचाही नैवेद्य
दाखवावा. ब्राह्मणांना पोटभर अन्न वाढून उरलेले इतर इच्छुकांना देऊन टाकावे. खरे
पाहता गोवर्धन पूजेचाच हा एक विधी होय.
यादिवशी
मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. राजस्थानमधील नाथद्वार, काशीतील अन्नपूर्णा मंदिर या ठिकाणी या दिवशी भाताचे डोंगर
असतात. उदेपूर येथे मिरवणूक निघते.
फल - श्रीविष्णूची प्राप्ती
गोवर्धन पूजन
कार्तिक शुद्ध प्रतिपदा
या दिवशी सकाळी घराच्या दाराजवळच्या भागात शेणाने गोवर्धनपर्वताचा आकार तयार
करावा. शास्त्रानुसार शिखरयुक्त, झाडे-झुडपांनी
व्यापलेला व फुलाफळांनी दाटालेला असे याचे वर्णन आहे; पण काही ठिकाणी त्याऎवजी तो मनुष्याकार करून
फुलांनी सजवितात. या वृक्षाची गंध-फुलांनी पूजा करून.
'गोवर्धन घराघर
गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छाय
गवांकोटि प्रदोभव ।'
नंतर भूषणीय
गाई-बैलांना आवाहन करून यथाविधी पूजा करावी. त्या दिवशी गाईचे सर्व दूध वासरांना
पाजावे.
'लक्ष्मीर्या
लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता ।
घृतं वहति
यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ।'
अशी प्रार्थना
करून रात्री गाईंकडून गोवर्धनाचे उपमर्दन करावे.
द्यूत प्रतिपदा
कार्तिक शुद्ध
प्रतिपदा या तिथीस द्यूत खेळावे, असे धर्मशास्त्राचे वचन
आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून लक्षपूर्वक द्यूतक्रीडा खेळावी.
त्यावरून वर्ष कसे जाईल याची कल्पना करता येते.
कार्तिक व्रत
हे एक
स्त्रीव्रत. हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून कार्तिक व. अमावस्येपर्यंत करतात.
त्याचा विधी - प्रात:काली स्नान करून विष्णुपूजा करावी व दररोज काहीतरी दान
द्यावे. तूप व मध घालून तयार केलेले अन्न देवपितरांना समर्पावे व दीप प्रज्वलित
करावेत.
व्रताचे फल -
सौभाग्य व गोलोक यांची प्राप्ती.
रथयात्रेचे व्रत
या दिवशी
रथयात्रेचे एक व्रत आहे. या व्रताचा विधी आश्विन अमावस्येस उपवास करावा. कार्तिक शुद्ध
प्रतिपदेस अग्नी व ब्रह्मा या देवता रथात ठेवून चांगल्या विद्वान
ब्राह्मणाच्याकरवी तो रथ ओढवावा. जागोजागी रथ थांबवून त्यातील देवतांस आरती
ओवाळावी. जे भक्तिपूर्वक दर्शन घेतात. ते सर्वोच्च लोकाला जातात.
देवीव्रत
हे व्रत कार्तिक
महिन्यात करतात. व्रतकालात व्रतकर्त्याने दिवसा दुधावर आणि रात्री फक्त
भाजीपाल्यावर निर्वाह करायचा असतो. दुर्गादेवीची पूजा व तिळाचा होम असा या व्रताचा
विधी आहे. या व्रतात पुढील मंत्रांचा जप करायचा असतो -
जयन्ती मंगला काल
भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा
शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोऽस्तु ते ॥
फल - पाप, रोग,
भय यांच्यापासून मुक्ती.
दुसरा पर्याय -
व्रतकर्त्याने
शंभू व गौरी, जनार्दन व लक्ष्मी, सूर्य व त्याची
पत्नी यांच्या मूर्तीची पूजा करावी आणि घंटा व दिवा यांचे दान द्यावे.
फल - पवित्र व
सुंदर देहाची प्राप्ती.
तिसरा पर्याय -
कोणत्याही
पौर्णिमेला दुधावर राहून गाय दान देणे.
फल -
लक्ष्मीलोकप्राप्ती.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
गुजराती संवत २०७२
गुजराथी कालगणनेनुसार प्लवंगनाम
संवत्सराची सुरवात होत आहे. हेच
विक्रमसंवत्सर होय.
महावीर जैन संवत्सर
महावीर जैन कालगणनेनुसार संवत
२५४२ ची सुरवात होत आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment