तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल १४ (९:१७), मार्गशीर्ष पौर्णिमा (२९:३६)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (२१:४१)
|
योग
|
साध्य (२४:३९)
|
करण
|
विष्टि (१९:२५)
|
पिशाच्च मोचन यात्रा
ही सांवत्सरिक
यात्रा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला निघते. या दिवशी कपर्दीश्वरा ( शिव )- समीप
स्नान करून यात्रा करावी. ही यात्रा करणाराला अन्यत्र मृत्यू आला तरी तो
पिशाच-योनीत जात नाही, आणि तीर्थादी ठिकाणी घेतलेल्या दानाचे पाप नष्ट
होते.
शिवचतुर्दशी व्रत
शास्त्रामध्ये या
व्रताचे विशेष विधान सांगितलेले आहे. या व्रतात मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला
एकभुक्त राहून चतुर्दशीला निराहर उपवास करावा. शिवाची पूजा करावी. पुजनात स्नान
घातल्यानंतर
'शिवाय नमः पादौ ।
सर्वात्मने शिरः
।
त्रिनेत्राय
ललाटम् ।
हराय
नेत्रयुग्मम् ।
इन्दुमुखाय मुखम्
।
श्रीकंठाय
स्कन्धौ ।
सद्यौजाताय कर्णो
।
वामदेवाय भुजौ ।
अघोरहृदयाय हृदयम
।
तत्पुरुषाय
स्तनौ।
ईशानाय उदरम् ।
अनंतधर्माय
पार्श्वम् ।
ज्ञानभूताय कटिम्
।
अनंतवैराग्यसिंहाय
ऊरू ।
प्रधानाय जंघे ।
व्योमात्मने
गुल्फौ ।
व्युप्तकेशात्मरूपाय
पृष्ठम् अर्चचामि ।
याप्रमाणे
अंगपूजा करून
'नमः पुष्टयै, नमस्तुष्टयै ।
म्हणून
पार्वतीपूजन करावे. त्यानंतर
प्रीयतां
देवदेवोऽत्र सद्योजातः पिनाकधृक्'
अशी प्रार्थना
करावी व वृषभ, सूवर्ण , जलपूर्ण कलश, गंध,
पंचरत्न, आणि अनेक प्रकारचे भोजनपदार्थ ब्राह्माणाला अर्पण करावे व
थोडे तूप सेवन करून भूमीवर झोपावे. नंतर पौर्णिमेला ब्राह्मणांची पूजा करून त्यास
जेवू घालावे. अशा प्रकारे वद्य चतुर्दशीसही करावे, पुढे प्रत्येक
महिन्याच्या दोन्ही चतुर्दशींना शिवपूजनादी केल्यावर
मार्गशीर्षात
|
गोमूत्र
|
पौषात
|
गोमय
|
माघात
|
गोदुग्ध
|
फाल्गुनात
|
गोदधी
|
चैत्रात
|
गोघृत
|
वैशाखात
|
कुशोदक
|
ज्येष्ठात
|
पंचगव्य
|
आषाढात
|
बिल्व
|
श्रावणात
|
जव
|
भाद्रपदात
|
गोशृंगजल
|
आश्विनात
|
जल
|
कार्तिकात
|
काळे तीळ
|
याप्रमाणे पदार्थ
यथाविधी भक्षण करावे.
शिवपुजनास
निरनिराळ्या महिन्यात निरनिराळी फुले घ्यावीत.
मार्गशीर्षात
|
कमळे
|
पौषात
|
मंदाराची फुले
|
माघात
|
मालती
|
फाल्गुनात
|
धोतरा
|
चैत्रात
|
निर्गुडीची
|
वैशाखात
|
अशोक
|
ज्येष्ठात
|
मल्लिका
|
आषाढात
|
पाटल
|
श्रावणात
|
अर्कपुष्प
|
भाद्रपदात
|
कदंब
|
आश्विनात
|
शतपत्री
|
कार्तिकात
|
उत्पल (कमल)
|
अशा तर्हेने
पूजन केल्याने देवदेवेश महादेव प्रसन्न होतात व महाफल प्राप्त होते. शास्त्रात
म्हटले आहे की, हे व्रत केल्याने महाफल मिळते.
श्री दत्तात्रेय जयंती - गाणगापूर क्षेत्री श्रीदत्त जयंती उत्सव
ही पौर्णिमा
प्रदोषव्यापिनी घ्यावी. मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी म्रुग नक्षत्रात बुधवारी
सायंकाळी अत्रिऋषीची पत्नी अनसूया प्रसूत झाली . अत्रिऋषींनी तो प्रत्यक्ष विष्णू
जन्माला आला, असे समजून त्याचे नामकरण केले. ईश्वर स्वतः
आपणाते देता झाला म्हणून तो दत्त आणि स्वस्थ म्हणजे अत्रीचा पुत्र असल्यामुळे
आत्रेय, मिळून दत्तात्रेय असे नाव ठेवले. म्हणून
जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात होतो. त्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण, सायंकाळी जन्माचे किर्तन इ. कार्यक्रम करतात. ज्यांना
गुरुचरित्राचे पारायण शक्य नसेल, ते सात दिवस गुरु
दत्तात्रेयाच्या नाममंत्राचा जप करतात. या दिवशी दत्तात्रेय - नवरात्र संपते.
अग्रहायणी
मार्गशीर्ष शुध्द
पौर्णिमेस मृग नक्षत्र असता करावयाचा हा पाकयज्ञ (एक होमविधि) असतो.
प्रत्यवरोहण
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
भद्रा
९:१७ नंतर १९:२५ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व
कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment