तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल ११ (१९:४५)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
रेवती (८:२९), अश्विनी (३०:१४)
|
योग
|
वरीयान (१७:०६)
|
करण
|
वणिज (९:११), बव (३०:११)
|
मोक्षदा एकादशी
शुद्धा एकादशी, तसेच नियमादिविषयक निर्णय पूर्वीप्रमाणे घेऊन मार्गशीर्ष शुक्ल दशमीच्या दिवशी मध्यान्ही जवाची भाकरी व मुगाची
डाळ याचे एकच वेळ भोजन करावे आणि एकादशीच्या दिवशी प्रातःस्नानादी नित्य कर्मे
उरकून उपोषण करावे. श्रीविष्णूची पूजा करावी. रात्री जागर करून द्वादशीला एकभुक्त
राहून पारणे करावे. ही एकादशी मोहाचा नाश करणारी आहे. म्हणून हिला 'मोक्षदा' एकादशी म्हणतात.
गीताजयंती
सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी
अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस
गीता जयंती म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दिवशी गीता, श्रीकृष्ण, व्यास आदींच्या पूजा करून गीताजयंतीचा उत्सव साजरा करावा.
गीतापाठ, गीतेवर व्याख्यान, प्रवचन इ.
कार्यक्रम करावे. शक्य असेल तर गीतेची मिरवणूक काढावी.
दीपव्रत
मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला या
व्रताचा आरंभ करतात. हे व्रत एक वर्षभर करावयाचे असते. याचा विधी- पहाटे नदीवर
स्नान करतात. नंतर वैदिक मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणाला पंचामृताने स्नान घालतात.
तांब्याच्या अथवा मातीच्या दिव्यात नऊ धाग्यांची वात घालून तो दिवा देवापुढे
ठेवतात. उद्यापनाच्या वेळी सोन्याचा दिवा करून दान देतात.
फल-विष्णुलोकप्राप्ती.
घबाड
१९:४५ नंतर ३०:१४ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: जेष्ठा
चंद्र
नक्षत्र : अश्विनी
तिथी: शुक्ल १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
९:११ नंतर १९:४५ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment