तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ३ (२०:३६)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (१४:२५)
|
योग
|
ब्रह्मा (१३:१५)
|
करण
|
वणिज (९:४५)
|
संकष्ट चतुर्थी
पुणे चंद्रोदय-२०:३८
काही ठिकाणी चतुर्थी १७
तारखेला आहे.
या चतुर्थीला 'चिंतामणी चतुर्थी' म्हणतात. या दिवशी दिवसभर केवळ पाणी पिऊन उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर
कलशावर श्रीचिंतामणी गणेशाची स्थापना करून पूजा करावी. अर्घ्यदान द्यावे आणि
मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण भोजन घालून मग स्वतः जेवावे. यामुळे
सर्वप्रकारचे मोह नष्ट होतात, चित्ताची भ्रांती नष्ट होते आणि
सुख प्राप्त होते.
अयोध्येचा राजा या व्रताच्या प्रभावाने सर्व संकटातून मुक्त झाला, प्रजा आनंदी झाली. तसेच, मालवदेशात कर्णनगरीत राहणारी एक
रूपवान गणिका अजाणपणे तिच्या हातून या चतुर्थीचा उपवास घडल्याने त्याच्या
पुण्यप्रभावाने सर्व पापांपासून मुक्त होऊन ब्रह्मलोकात गेली अशी आख्यायिका आहे.
धनुर्मासारंभ / झुंझुरमास आरंभ
सूर्य धनु राशीत असे पर्यंत
म्हणजे मकर संक्रांती पर्यंत धनुर्मास किंवा झुंझुरमास साजरा करतात.
या संपूर्ण कळत दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पूजा करावी .
धूतवस्त्र घालून स्वयंपाक करावा. यात तांदूळ व मुगच्या डाळीची खिचडी हा मुख्य
पदार्थ असतो. तसेच वांग्याची भाजी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यांचाही
समावेश असतो. सूर्यास्त झाल्यावर देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवून लगेच भोजन
करावे.
बहुतांश लोक हा सण फ़क़्त
शेवटच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी (भोगी) साजरा करतात.
भद्रा
९:४५ नंतर २०:३६ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment