Sunday, 20 December 2015

दिनविशेष - २१ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल ११ (२५:१२) 
वार
 सोमवार    
नक्षत्र
 अश्विनी (१८:०९)
योग
 परिघ (९:५७), शिव (३०:४९)
करण
 वणिज (१४:२२)

मोक्षदा एकादशी

शुद्धा एकादशी, तसेच नियमादिविषयक निर्णय पूर्वीप्रमाणे घेऊन मार्गशीर्ष शुक्ल दशमीच्या दिवशी मध्यान्ही जवाची भाकरी व मुगाची डाळ याचे एकच वेळ भोजन करावे आणि एकादशीच्या दिवशी प्रातःस्नानादी नित्य कर्मे उरकून उपोषण करावे. श्रीविष्णूची पूजा करावी. रात्री जागर करून द्वादशीला एकभुक्त राहून पारणे करावे. ही एकादशी मोहाचा नाश करणारी आहे. म्हणून हिला 'मोक्षदा' एकादशी म्हणतात.

गीताजयंती

सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी दिवशी गीता, श्रीकृष्ण, व्यास आदींच्या पूजा करून गीताजयंतीचा उत्सव साजरा करावा. गीतापाठ, गीतेवर व्याख्यान, प्रवचन इ. कार्यक्रम करावे. शक्य असेल तर गीतेची मिरवणूक काढावी.

दीपव्रत

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला या व्रताचा आरंभ करतात. हे व्रत एक वर्षभर करावयाचे असते. याचा विधी- पहाटे नदीवर स्नान करतात. नंतर वैदिक मंत्र म्हणून लक्ष्मीनारायणाला पंचामृताने स्नान घालतात. तांब्याच्या अथवा मातीच्या दिव्यात नऊ धाग्यांची वात घालून तो दिवा देवापुढे ठेवतात. उद्यापनाच्या वेळी सोन्याचा दिवा करून दान देतात.
फल-विष्णुलोकप्राप्ती.

दग्धयोग

२५:१२ पर्यंत सोमवारी एकादशी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



घबाड

२५:१२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मूळ
चंद्र नक्षत्र : भरणी
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


१४:२२ नंतर २५:१२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment