तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ३ (१४:४३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पुष्य (११:४९)
|
योग
|
वैधृति (१३:५८)
|
करण
|
बव (२७:००)
|
संकष्टी चतुर्थी / चिंतामणी चतुर्थी
पुणे चंद्रोदय : २०:५६
या चतुर्थीला 'चिंतामणी चतुर्थी' म्हणतात. या दिवशी दिवसभर केवळ पाणी पिऊन उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर
कलशावर श्रीचिंतामणी गणेशाची स्थापना करून पूजा करावी. अर्घ्यदान द्यावे आणि
मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण भोजन घालून मग स्वतः जेवावे. यामुळे
सर्वप्रकारचे मोह नष्ट होतात, चित्ताची भ्रांती नष्ट होते आणि
सुख प्राप्त होते.
अयोध्येचा राजा या व्रताच्या प्रभावाने सर्व संकटातून मुक्त झाला, प्रजा आनंदी झाली. तसेच, मालवदेशात कर्णनगरीत राहणारी एक
रूपवान गणिका अजाणपणे तिच्या हातून या चतुर्थीचा उपवास घडल्याने त्याच्या
पुण्यप्रभावाने सर्व पापांपासून मुक्त होऊन ब्रह्मलोकात गेली अशी आख्यायिका आहे.
घबाड
१४:४३ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मूळ
चंद्र
नक्षत्र : आश्लेषा
तिथी:
१५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी
मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
१४:४३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment