Thursday, 30 June 2016

दिनविशेष - १ जुलै - २०१६



तिथी
 जेष्ठ कृष्ण १२ (२४:२३)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 कृत्तिका (२३:५८)
योग
 धृति (९:१०), शूल (२९:४७)
करण
 कौलव (१३:४९)

भागवत एकादशी

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते. वैष्णवलोक भागवत एकादशी पाळतात.
या दोन एकादश्या केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात सविस्तर विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले आढळतात. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर भरपूर लेखन केलेले आढळते. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे
कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जया (जयदा) व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी
वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी.
या व्यतिरिक्त अधिक मास असेल त्यावेळी २ एकादशी येतात त्यांस कमला एकादशी म्हणतात.

एकादशीचे नित्यकाम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.

काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे जो कोणी विष्णुपरायण होऊन संसार सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्‍वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल इच्छितो त्याने उभय पक्षातील एकादशीला अन्न ग्रहण करू नये. तुकारामाने एकादशीचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्‍वान विष्ठेसमान|
अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग|
करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय रोग|
 जन्मव्याधी बळिवंत॥

यमघंट योग

२३:५८ नंतर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 29 June 2016

योगिनी एकादशी



ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे आचरुन
'मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोगनिवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून श्रिपुंडरीकाक्ष भगवंताचे (विष्णूचे) पूजन करावे. त्याच्या चरणोदकाने सर्वांगावर मार्जन करावे आणि उपवास करुन रात्री जागरण करावे, म्हणजे कुष्ठादी सर्व रोगांपासून मुक्त होतो.
योगिनी एकादशी कथा -
युधिष्ठिराने विचारले, 'हे मधुसूदना, जेष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय? आणि तिचे माहात्म्य काय? हे मला कृपा करून सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, सर्व पापांचा क्षय करणारे, ऐश्वर्य व मोक्ष देणारे व सर्व व्रतांत उत्तम असणारे व्रत तुला सांगतो. हे नृपश्रेष्ठा, जेष्ठ वद्य पक्षातील ही योगिनी नावाची एकादशी महापातकाचा नाश करणारी आहे. ही सनातन एकादशी संसाररुपी सागरात बुडणार्‍यांना नौकेप्रमाणे वाटते. हे नराधीषा, ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे. या एकादशीची पाप हरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो.
अलका नगरीचा राजा कुबेर शिवपूजक होता. त्याच्याकडे पूजेकरता फुले आणण्यासाठी हेममाली नावाचा माळी होता. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची पत्‍नी होती. ती फार सुंदर होती. हेममाली तिच्या कामपाशत सापडून तिच्यावर फार प्रेम करीत होता.
तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला होता. त्याने नित्याप्रमाणे मानस-सरोवरातून फुले आणली, पण पत्‍नीचे मुख पाहून तो मोहीत झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्‍नीप्रेमात गुंतून घरीच राहिला.
इकडे कुबेर देवालयात बसून पूजा करीत होता. माध्यान्ह काल होईपर्यंत तो फुलांची वाट पाहत बसून राहिला. हेममाली आपल्या घरी आपल्या प्रेयसीसह क्रीडा करीत राहिला.
यक्षराजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागावला. तो आपल्या दूतांना म्हणाला, 'यक्षांनो, तो दुराधम हेममाली अजून का येत नाही. याचा तपास करा पाहू.'
कुबेर पुन्हा पुन्हा असे म्हणाला तेव्हा यक्ष म्हणाले, 'राजा, तो स्त्रीलंपट त्याच्या घरी स्वतःच्या पत्‍नीसह क्रीडा करीत आहे.'
हे ऐकताच कुबेर क्रोधाने जणू भरून गेला. त्याने तात्काळ हेममालीला बोलावून आणले. फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेममाली घाबरला. त्याच्या नेत्रात भय दिसू लागले. तो कुबेरासमोर येऊन नमस्कार करून उभा राहिला.
त्याला पाहताच कुबेराला क्रोध आला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले. तो रागाने ओठ चावून म्हणाला, 'अरे पाप्या, दुष्टा, दुराचार्‍या तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्‍नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी (पांढर्‍या कोडाचा) होशील व येथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील !'
कुबेराचा हा शाप ऐकताच हेममालीच्या अंगात कोड भरले. आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला. त्याला प्रचंड दुःख झाले. त्या भीषण वनात त्याला अन्नपाणी मिळेना. त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना. त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात तर फार पीडा होत असे. पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली.
तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्माचे स्मरण करीत भटकत राहिला. फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला. तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयांचे दर्शन झाले. त्या मार्कंडेयाला ब्रह्मदेवाचे सात दिवस म्हणजे सात कल्पे आयुष्य आहे.
तो पापी हेममाली मार्कंडेयाच्या आश्रमात गेला. तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता. त्याने त्या ऋषीच्या चरणांना दुरूनच वंदन केले.
मार्कंडेय ऋषीने त्या कुष्ट्याला पाहिले. जवळ बोलावून ऋषीने त्याला विचारले, 'अरे, तुला असे कुष्ट कशामुळे झाले? तुझी अशी निंदास्पद स्थिती कशी झाली?'
त्यावर हेममाली म्हणाली, 'मी यक्षराजा कुबेराचा हेममाली नावाचा सेवक आहे. हे मुनी, मी कुबेराला रोज शिवपूजेच्या वेळी मानस-सरोवरातून फुले आणून देत असे. एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्रीसौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला मला उशीर झाला. ऋषीश्रेष्ठा, त्यामुळे कुबेर रागावला व त्याने मला शाप दिला. त्या शापामुळेच माझा व पत्‍नीचा वियोग झाला. माझे शरीर कुष्टाने भरले. आणि मी अरण्यात जाऊन पडलो. आता पूर्व पुण्यामुळे मी तुमच्याजवळ येऊन पोचलो आहे. साधुपुरुषांच्या अंतःकरणाचा कल नेहमीच परोपकार करण्याकडे असतो, हे तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनीश्रेष्ठा, मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा.'
मार्कंडेय ऋषी म्हणाला, 'तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो. जेष्ठ वद्य पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत तू कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल.'
मुनीचे हे बोलणे ऐकून हेममालीला फार आनंद झाला. त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनीला दंडवत घातला. मुनीने त्याला उठवले.
मार्कंडेयाच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ट गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला. त्याचा व पत्‍नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले.
नृपश्रेष्ठा, योगिनी एकादशीचे व्रत हे असे आहे. अट्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याने जे फळ मिळते, तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभते.
॥याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

दिनविशेष - ३० जून - २०१६




तिथी
 जेष्ठ कृष्ण ११ (२७:१४)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 भरणी (२६:००)
योग
 सुकर्मा (१२:३०)
करण
 बव (१६:३८)

योगिनी (स्मार्त) एकादशी

एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते.
ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे आचरुन
'मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोगनिवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून श्रिपुंडरीकाक्ष भगवंताचे (विष्णूचे) पूजन करावे. त्याच्या चरणोदकाने सर्वांगावर मार्जन करावे आणि उपवास करुन रात्री जागरण करावे, म्हणजे कुष्ठादी सर्व रोगांपासून मुक्त होतो.
योगिनी एकादशी कथा
युधिष्ठिराने विचारले, 'हे मधुसूदना, जेष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय? आणि तिचे माहात्म्य काय? हे मला कृपा करून सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, सर्व पापांचा क्षय करणारे, ऐश्वर्य व मोक्ष देणारे व सर्व व्रतांत उत्तम असणारे व्रत तुला सांगतो. हे नृपश्रेष्ठा, जेष्ठ वद्य पक्षातील ही योगिनी नावाची एकादशी महापातकाचा नाश करणारी आहे. ही सनातन एकादशी संसाररुपी सागरात बुडणार्‍यांना नौकेप्रमाणे वाटते. हे नराधीषा, ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे. या एकादशीची पाप हरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो.
अलका नगरीचा राजा कुबेर शिवपूजक होता. त्याच्याकडे पूजेकरता फुले आणण्यासाठी हेममाली नावाचा माळी होता. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची पत्‍नी होती. ती फार सुंदर होती. हेममाली तिच्या कामपाशत सापडून तिच्यावर फार प्रेम करीत होता.
तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला होता. त्याने नित्याप्रमाणे मानस-सरोवरातून फुले आणली, पण पत्‍नीचे मुख पाहून तो मोहीत झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्‍नीप्रेमात गुंतून घरीच राहिला.
इकडे कुबेर देवालयात बसून पूजा करीत होता. माध्यान्ह काल होईपर्यंत तो फुलांची वाट पाहत बसून राहिला. हेममाली आपल्या घरी आपल्या प्रेयसीसह क्रीडा करीत राहिला.
यक्षराजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागावला. तो आपल्या दूतांना म्हणाला, 'यक्षांनो, तो दुराधम हेममाली अजून का येत नाही. याचा तपास करा पाहू.'
कुबेर पुन्हा पुन्हा असे म्हणाला तेव्हा यक्ष म्हणाले, 'राजा, तो स्त्रीलंपट त्याच्या घरी स्वतःच्या पत्‍नीसह क्रीडा करीत आहे.'
हे ऐकताच कुबेर क्रोधाने जणू भरून गेला. त्याने तात्काळ हेममालीला बोलावून आणले. फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेममाली घाबरला. त्याच्या नेत्रात भय दिसू लागले. तो कुबेरासमोर येऊन नमस्कार करून उभा राहिला.
त्याला पाहताच कुबेराला क्रोध आला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले. तो रागाने ओठ चावून म्हणाला, 'अरे पाप्या, दुष्टा, दुराचार्‍या तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्‍नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी (पांढर्‍या कोडाचा) होशील व येथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील !'
कुबेराचा हा शाप ऐकताच हेममालीच्या अंगात कोड भरले. आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला. त्याला प्रचंड दुःख झाले. त्या भीषण वनात त्याला अन्नपाणी मिळेना. त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना. त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात तर फार पीडा होत असे. पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली.
तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्माचे स्मरण करीत भटकत राहिला. फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला. तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयांचे दर्शन झाले. त्या मार्कंडेयाला ब्रह्मदेवाचे सात दिवस म्हणजे सात कल्पे आयुष्य आहे.
तो पापी हेममाली मार्कंडेयाच्या आश्रमात गेला. तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता. त्याने त्या ऋषीच्या चरणांना दुरूनच वंदन केले.
मार्कंडेय ऋषीने त्या कुष्ट्याला पाहिले. जवळ बोलावून ऋषीने त्याला विचारले, 'अरे, तुला असे कुष्ट कशामुळे झाले? तुझी अशी निंदास्पद स्थिती कशी झाली?'
त्यावर हेममाली म्हणाली, 'मी यक्षराजा कुबेराचा हेममाली नावाचा सेवक आहे. हे मुनी, मी कुबेराला रोज शिवपूजेच्या वेळी मानस-सरोवरातून फुले आणून देत असे. एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्रीसौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला मला उशीर झाला. ऋषीश्रेष्ठा, त्यामुळे कुबेर रागावला व त्याने मला शाप दिला. त्या शापामुळेच माझा व पत्‍नीचा वियोग झाला. माझे शरीर कुष्टाने भरले. आणि मी अरण्यात जाऊन पडलो. आता पूर्व पुण्यामुळे मी तुमच्याजवळ येऊन पोचलो आहे. साधुपुरुषांच्या अंतःकरणाचा कल नेहमीच परोपकार करण्याकडे असतो, हे तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनीश्रेष्ठा, मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा.'
मार्कंडेय ऋषी म्हणाला, 'तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो. जेष्ठ वद्य पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत तू कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल.'
मुनीचे हे बोलणे ऐकून हेममालीला फार आनंद झाला. त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनीला दंडवत घातला. मुनीने त्याला उठवले.
मार्कंडेयाच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ट गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला. त्याचा व पत्‍नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले.
नृपश्रेष्ठा, योगिनी एकादशीचे व्रत हे असे आहे. अट्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याने जे फळ मिळते, तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभते.
॥याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

घबाड

२६:०० नंतर २७:१४ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आर्द्रा
चंद्र नक्षत्र : कृत्तिका
तिथी: १५+११ = २६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५ x ३ = ७५
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १४ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

यमघंट योग

२६:०० नंतर गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट