तिथी
|
भाद्रपद कृष्ण ११ (१९:१८)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (१९:०३)
|
योग
|
साध्य (२७:०७)
|
करण
|
बव (८:३५), बालव (१९:१८)
|
इंदिरा एकादशी / कृष्णैकादशी
या एकादशीला इंदिरा एकादशी
म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व पापे दूर होतात व पितरांचा उद्धार होतो. त्यासाठी
सकाळी स्नान करून उपवास करावा आणि हरिचिंतनात रात्र घालवावी. जर या दिवशी
पितृश्राद्ध-तिथी असेल तर व उपवासामुळे श्राद्धीय अन्न ग्रहण करण्यास संकोच वाटेल
तर त्याचा वास घेऊन ते गाईस घालावे आणि पारणे केल्यावर भोजन करावे.
घबाड
१९:०३ नंतर १९:१८
पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: हस्त
चंद्र नक्षत्र : मघा
तिथी: कृष्ण ११ =
१५ + ११ = २६
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = २५
२५ x ३ = ७५
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी मिळवू :
७५ + २६ = १०१
आता ७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
मृत्यू योग
१९:०३ पर्यंत शुक्रवारी
आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी एकादशी असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment