तिथी
|
आश्विन शुक्ल ८ (१२:५०)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (२१:२८)
|
योग
|
सुकर्मा (८:४५)
|
करण
|
बव (१२:५०), बालव (२६:१०)
|
दुर्गाष्टमी / महाअष्टमी
आश्विन शुक्ल अष्टमीला
देवीच्या उपासनेची अनेक अनुष्ठाने होतात म्हणून ही तिथी महाष्टमी म्हणून ओळखली
जाते. या तिथीस सप्तमीचा वेध व्रताचाराच्या दृष्टीने वर्ज्य समजावा व नवमीच
ग्राह्य मानावा. या दिवशी देवी शक्तिधारणा करते. नवमीला पूजासमाप्ती होते. म्हणून
सप्तमी वेधयुक्त महा-अष्टमीला पूजन केल्याने पुत्र-स्त्री-धनहानी होते. जर अष्टमी
मूळ नक्षत्रयुक्त व नवमी पूर्वाषाढायुक्त असेल अथवा दोहोंनी युक्त असेल तर ती
महानवमी होते. सूर्योदयासमयी अष्टमी, सूर्यास्तसमयी नवमी आणि वार मंगळवार असेल तर तो योग अधिक
श्रेष्ठ समजावा.
महाष्टमीला प्रात:काळी
शुचिर्भूत होऊन भगवतीची वस्त्र, शस्त्र, छत्र, चामर राजचिन्हादिसहित पूजा
करावी. त्यावेळी भद्रावती योग असेल तर पूजा संध्याकाळी करावी. आणी अर्धरात्रीला
बलिप्रदान करावे. कित्येक ठिकाणी या दिवशी 'अखिलकारणी' देवीचे पूजन करतात. हे पूजन भद्रासहित सायंकाळ किंवा
प्रात:काळ केव्हाही करता येते. त्यात केवळ त्रिशूळाची पूजा होते.
अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )
या देवीचे वर्णन आगम व
विष्णुपुराण यांत आढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व
कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय. शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी
अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही मध्ययुगीन शिल्पकृती.
हिचा फेरा आपल्या घरावर येऊ
नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शुक्ल अष्टमीस महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या
नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन करतात. ही घरातून निघून जावी म्हणून
काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी
आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट
बाहेर वात लावून ती घरात आणणे म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी
अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.
सरस्वती बलिदान
नवरात्रामध्ये मूळ नक्षत्रावर भगवती
श्रीसरस्वतीचे आवाहन करतात. दुस-या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजन व तिस-या
दिवशी उत्तराषाढा नक्षत्रावर सरस्वतीला बलिदान अर्पण करून तिचे विसर्जन करतात. हा
उत्सव विशेषत: बंगाल प्रांतात साजरा होतो.
जीवत्पुत्रिका व्रत
एक स्त्री-व्रत. आश्विन
शुक्ल अष्टमीस उत्तर प्रदेशातील स्त्रिया हे व्रत.करतात. या दिवशी उपवास करून दान
देतात. हे व्रत केल्याने पुत्रशोक होत नाही. असे सांगितले आहे.
महाष्टमी उपवास
अष्टमीचा उपवास या दिवशी
करावा.
एकरात्रोत्सवारंभ
नवरात्र सुरू होण्यापूर्वी
अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर
सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी
घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.
आयुधपूजन
कौरवांनी द्यूताच्या खेळात
पांडवाना हरविल्यानंतर पांडवाना १४ वर्ष वनवास व त्यातील एक वर्ष अज्ञातवासात
घालवावे लागले. या काळात पांडवांचे वास्तव्य विराटनगरीत होते. पुढे जेव्हा विराट
राजाच्या गाई कौरवांनी पळविल्या तेव्हा पांडवानी युद्ध करून त्या गाई विराटराजाला
परत मिळविण दिल्या अशी कथा आहे. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवानी आपली शस्त्रे
शमीच्या झाडाच्या ढोलीत लपविली होती. तीच शस्त्रे त्यांनी या युद्धात वापरली.
म्हणून या दिवशी शमीच्या वृक्षाची व शस्त्रांची पूजा करतात.
नवमी उपवास
नवमीचा उपवास या दिवशी
करावा.
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी आश्विन शुक्ल ९ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही.
तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment