Tuesday, 16 October 2018

दिनविशेष - २० ऑक्टोबर २०१८


तिथी
आश्विन शुक्ल ११ (२०:०१)
वार
शनिवार
नक्षत्र
शततारका (२९:४७)
योग
गंड (११:२२)
करण
वणिज (७:०३), विष्टि (२०:०१)


पाशांकुशा एकादशी

पापपरायण पुरुषांच्या पापनिर्मूलनासाठी आश्‍विन शुक्ल एकादशीचे व्रत म्हणजे रामबाण उपाय होय. म्हणूनच या एकादशीला पापाङ्‌कुशा एकादशी म्हणतात. या व्रताने स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते. आरोग्य टिकून राहते, सुंदर व सुशील पत्‍नी लाभते, सदाचारी पुत्र लाभतो आणि अक्षय धन प्राप्त होते. त्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे आणि रात्री त्याचेच भजन, चिंतन, नामगुणसंकीर्तन करण्यात काल घालवावा. दुसर्‍या दिवशी पूर्वाण्ह्समयी पारणे करून व्रताची समाप्ती करावी.

पुत्रप्राप्ती व्रत

आश्‍विन शुक्ल एकादशीला स्नान करून उपवाअ करावा आणि भगवान विष्णुची पूजा करावी. रात्री दूध देणार्‍या सवत्स गाईची पूजा करावी. दुसर्‍या दिवशी दिवसभर व्रतस्थ राहून रात्री भोजन करावे. अशा तर्‍हेने दर आश्‍विन शुक्ल एकादशीस याप्रमाणे बारा वर्षे किंवा दर महिन्याच्या शुक्ल एकादशीस याप्रमाणे बारा महिने हे व्रत करावे. द्वादश वर्षीय व्रताच्या दरवर्षी किंवा एकवर्षीय व्रताच्या दर महिन्यात क्रमश: (पहिल्या वर्षी / महिन्यात पहिला याप्रमाणे) पुढील नामजप करावा -
अपराजित, अजातशत्रू, पुराकृत, पुरंदर, वर्धमान , सुरेश, महाबाहू, प्रभू , विभू , सुभूती, सुमन, सुप्रचेता
या नावाने हरिस्मरण केले असता देवतुल्य दीर्घायुषी पुत्र लाभतो.

आकाशदिवा

आश्‍विन शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत, घराच्याबाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्यास आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधी पुढीलप्रमाणे - घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमल काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीच खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा, कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृती दीप करून अडकवावा. त्या दीपात मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामो ऽ दराय नभसि तुलायां लोलयासह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनन्ताय वेधसे ॥
याचे फल लक्ष्मीप्राप्ती हे आहे.

घबाड

२०:०१ नंतर २९:४७ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: चित्रा
चंद्र नक्षत्र : शततारका
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

७:०३ नंतर २०:०१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका


योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

एकादशी श्राद्ध

अपराण्ह काळी एकादशी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल ११ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



No comments:

Post a Comment