तिथी
|
आश्विन शुक्ल ३ (२९:२८)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१०:३०)
|
योग
|
विष्कंभ (९:५२)
|
करण
|
तैतिल (१७:४२), गरज (२९:२८)
|
सप्तनवरात्रोत्सवारंभ
नवरात्र सुरू होण्यापूर्वी
अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात,
पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र
करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा
उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून
नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.
सिंदूरतृतिया
आश्विन शुक्ल तृतियेला
चंपातेलामध्ये सिंदूर मिसळून तो देवीच्या केशपाशाच्या मध्यभागी अर्चून आरसा
दाखविला असता देवीची पूजा केल्यासारखी होते.
गुरुपालट
१९:२० वाजता गुरु वृश्चिक राशीत
प्रवेश करीत आहे. त्याचा पुण्यकाल सायंकाळी १७:२९ ते रात्री २१:११ पर्यंत आहे.
सिंहेला चवथा, मेषेला आठवा आणि धनु राशी साठी हा गुरु बारावा आहे. त्यांनी पीडा परिहारार्थ
पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक आहे.
शिवाय कर्क, वृश्चिक, मीन या राशींसाठी गुरु लोह पादाने येत आहे, त्यांनीही परिहारार्थ
पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक आहे.
गुरु बदलाच्यावेळी चंद्र
ज्या नक्षत्रात आहे ती राशी स्वजन्म राशीपासून कितवी आहे यावरून तो ग्रह कोणत्या
पदाने आला आणि त्याचे काय फल आहे हे ठरते.
राशी
|
पाद
|
फल
|
वृषभ, तुला, धनु
|
सुवर्ण
|
चिंता
|
मिथुन, कन्या, कुंभ
|
रौप्य
|
शुभ
|
मेष, सिंह, मकर
|
ताम्र
|
श्री प्राप्ती
|
कर्क, वृश्चिक, मीन
|
लोह
|
कष्ट
|
गुरु सुवर्ण पादाने आल्यास
त्याचे फळ चिंता जरी असेल तरी सुवर्णपादी गुरु शुभ आहे.
दानवस्तु : सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरबऱ्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले
जपसंख्या : १९ हजार
प्रतिमा : सुवर्ण प्रतिमा
जपमंत्र :
देवानांच ऋषीणांच गुरुं
कांचनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं
नमामि बृहस्पतिम्॥
गुरु प्रतिमा पूजन व संकल्प:
मम जन्मराशे: सकाशात्
अनिष्टस्थानस्थितगुरो: पीडापरिहारार्थम् एकादशस्थानवच्छुभफल प्राप्त्यर्थम् सुवर्ण
प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) दानंच करिष्ये |
गुरूच्या ध्यानाचा श्लोक
अहो वाचस्पते जीव
सिंधुमंडलसंभव ।
एह्यांगिरससंभूत ह्यारुढ
चतुर्भुज ।।
दंडाक्षसूत्र वरद कमंडलुधर
प्रभो ।
महानिंद्रेति संपूज्यो
विधिवन्नाकिनां गुरु: ।।
दानाचा श्लोक
बृहस्पतिप्रीतिकरं दानं
पीडा-निवारकम् ।
सर्वापत्ति विनाशाय
द्विजाग्र्याय ददाम्यहम ।।
मुस्लिम सफर मासारंभ
मुस्लीम कालगणनेच्या सफर या
महिन्याची सुरवात होत आहे.
तृतीया श्राद्ध
अपराण्ह काळी तृतीया तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी आश्विन शुक्ल ३ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment