Tuesday, 16 October 2018

दिनविशेष - १८ ऑक्टोबर २०१८



तिथी
आश्विन शुक्ल ९ (१५:२९)
वार
गुरुवार
नक्षत्र
श्रवण (२४:३४)
योग
धृति (९:४६)
करण
कौलव (१५:२९), तैतिल (२८:४६)


महानवमी


नवरात्रोत्थापन व पारणा

आश्‍विन शुक्ल दशमीला भगवतीचे यथाविधी पूजन करून आरती करावी.
मंत्रपुश्प करावा.
'मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चितम् ।
पूर्णं भवतु तत्सर्वं त्वत्प्रसादान्महेश्‍वरि ॥'
अशी प्रार्थना करावी.
'ॐ दुर्गायै नम: ।'
म्हणून एक फूल ईशान्य दिशेस सोडावे आणि
'गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ।
व्रतस्रोतो जलं वृद्धयै तिष्ठ गेहे च भूतये ॥'
अशा मंत्राने कलशस्थ देवमूर्ती वगैरे उठवून यथास्थान स्थापित करावी. जर मूर्ती मृत्तिकेची असेल आणि भात-गहूचे 'रुजवण' आले असेल तर दोन्ही वाजत-गाजत नजीकच्या जलाशयावर न्यावी आणि त्यांचे विसर्जन करावे. पुढीलप्रमाणे विसर्जनाचा मंत्र म्हणावा -
'दुर्गे देवी जगन्मात: स्वस्थानं गच्छ पूजिते ।
षण्मासेषु व्यतीतेषु पुनरागमनाय वै ।
इमां पूजां मया देवि यथाशक्त्योपपादिताम् ।
रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमम् ॥

सरस्वती विसर्जन

श्रवण नक्षत्रावर सरस्वती विसर्जन करावे.

देवीला बलिदान


उल्कानवमी

एक तिथिव्रत. या व्रतात आश्‍विन शुक्ल नवमीस महिषासुरमर्दिनीची पूजा करतात. व्रतावधी एक वर्ष. या व्रताला उल्का हे नाव पडण्याचे कारण, हे व्रत करणारा पुरुष त्याच्या शत्रूंना व व्रतकर्ती स्त्री तिच्या सवतींना उल्केप्रमाणे दिसतो, असे सांगितले आहे.

दुर्गानवमी

आश्‍विन शुक्ल नवमीचे हे नाव आहे. दुर्गेच्या नावाने व्रतारंभ करतात. व्रतावधी एक वर्षाचा. आश्‍विन मासापासून चारमहिन्यांचे तीन भाग करावे आणि प्रत्येक भागात दुर्गेच्या निरनिराळ्या रूपांची निरनिराळी फुले, सुगंधी द्रव्ये आणि नैवेद्यादी उपचारांनी पूजा करावी.
फल - शक्ती-संपत्ती यांची प्राप्ती.

प्रदीप्त नवमी

एक तिथिव्रत. आश्‍विन. शुक्ल नवमीला या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. व्रतविधी असा - व्रतकर्त्याने
'ओम् महाभगवत्यै महिषासुरमर्दिन्ये हुं फट्'
या सोळा अक्षरी मंत्राने देवीची पूजा करावी आणि गुग्गुळाचा गोळा अग्नीला अर्पण करावा. शिवाची पूजा करावी. गवताची एक हात लांबीची काडी घेऊन ती पेटवावी. काडी जेवढा वेळ जळेल तेवढ्या वेळात जेवढे अन्न खाता येईल तेवढेच खावे.
फल - शक्‍ती आणि विजय यांची प्राप्ती.

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
स्वायंभुव
 चैत्र शुक्ल तृतीया
स्वारोचीस
 चैत्र शुक्ल पौर्णिमा
उत्तम
 कार्तिक शुक्ल पौर्णिमा
तामस
 आषाढ शुक्ल पौर्णिमा
रैवत
 कार्तिक शुक्ल द्वादशी.
चाक्षुस
 आषाढ शुक्ल दशमी.
वैवस्वत
 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
सावर्णी
 फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
दक्ष सावर्णी
 आश्विन शुक्ल नवमी.
१०
ब्रह्म सावर्णी
 माघ शुक्ल सप्तमी
११
धर्म सावर्णी
 पौष शुक्ल एकादशी.
१२
रुद्र सावर्णी
 भाद्रपद शुक्ल तृतीया.
१३
देव / रुची सावर्णी
 फाल्गुन शुक्ल अमावस्या.
१४
इंद्र/ भूती सावर्णी
 श्रावण कृष्ण अष्टमी.
मनुबाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत म्हटले आहे

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता  अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना  सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु  हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन  माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.

विजयादशमी (दसरा) 

शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन

आश्‍विन शुक्ल दशमील श्रवण-नक्षत्रयोग असता विजयादशमी असते. या दिवशी राज्यवृद्धीच्या भावनेने आणि विजयप्राप्तीच्या आकांक्षेने राजेलोक 'विजयकाली' प्रस्थान करतात. 'ज्योतिर्निबंध' ग्रंथात लिहिले आहे की,
'आश्‍विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये
स कालो विजयो ज्ञेय: सर्वकार्यार्थ सिद्धये ॥'
आश्‍विन शुक्ल दशमीला संध्याकाळी तारकोदयाचा समय हा 'विजयकाल' होय. या वेळी केलेली सर्व कार्ये सिद्धी पावतात. आश्‍विन शुक्ल दशमी पूर्वविद्ध निषिद्ध, परविद्धा शुद्ध आणि श्रवणयुक्त सूर्योदयव्यापिनी सर्वश्रेष्ठ होय. राजेलोकांनी या दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकून
'मम क्षेमारोग्यादिसिद्धयर्थं यात्रायां विजयसिद्धयर्थं गणपतिमातृकामार्गदेवता परजिताशमीपूजनानि करिष्ये ।'
असा संकल्प करून उपर्युक्त सर्व देवता, अस्त्रशस्त्र-अश्‍वादी, तसेच पूजनीय गुरुजन, इत्यादींची यथाविधी पूजा करावी आणि उत्तमतर्‍हेने सजवलेल्या घोड्यावर आरूढ होऊन अपराण्हसमयी गज, तुरंग, रथ राज्यैश्‍वर्य इत्यादिसहित स्वारीस निघावे. आपल्या नगराच्या बाहेर ईशान्य कोपर्‍यात शमी आणि अश्‍मन्तक (आपटा) वृक्षाच्या समीप घोड्यावरून उतरावे. शमीच्या बुंध्याजवळच्या भूमीवर प्रोक्षण करावे आणि पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून प्रथम शमीवृक्षाचे, नंतर अश्‍मंतक वृक्षाचे पूजन करावे. नंतर
'शमी शमय मे पापं शमी लोहितकंटका ।
धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवांदिनी ॥
करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मम ।
तत्र निर्विघ्नकर्ती त्वं भव श्रीरामपूजिते ॥'
या मंत्राने शमीची प्रार्थना करावी आणि
'अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारक ।
इष्टानां दर्शन देहि शत्रूणां च विनाशनम् ।'
अशा मंत्राने अश्‍मन्तकाची प्रार्थना करावी. नंतर शमीची किंवा अश्‍मन्तकाची किंवा दोहोंची पाने घेऊन त्यात पूजास्थानची थोडीशी माती आणि थोडे तांदूळ व एक सुपारी ठेवून कपड्यात बांधून घ्यावी आणि कार्यसिद्धीच्या कामनेने स्वत:पाशी ठेवावी. नंतर आचार्यादिकांचे आशीर्वाद घेऊन तेथेच पूर्वदिशेला विष्णूला प्रदक्षिणा करून आपल्या शत्रूचे स्वरूप ह्रदयामध्ये आणि त्याची प्रतिकृती डॊळ्यात उभी करून तोफ, बंदूक किंवा सुवर्णशर याने त्याच्या ह्रदयाच्या मर्मस्थलाचा भेद करावा अणि हाती खड्‌ग घेऊन दक्षिण दिशेला आरंभ करून वृक्षानजीकच्या चारी दिशांना भ्रमण करून विजय प्राप्त करावा आणि 'शत्रूला जिंकले आहे' असे म्हणावे. यानंतर नगराकडे पूर्ववत परतावे आणि प्रवेशद्वारी आरती करून निवास करावा.

विजय मुहूर्त

१४:१६ ते १५:०३ (पुणे शहरानुसार)
दिवसाच्या ११व्या मुहूर्ताला विजय मुहूर्त म्हणतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चे १५ समान भाग केल्यास एक भाग म्हणजे एक मुहूर्त होतो.

पुणे शहरानुसार

सूर्योदय
६:३०
सूर्यास्त
१८:१०
दिनमान
११ तास ४० मिनिट = ७०० मिनिटे
१ मुहूर्त कालावधी
७०० / १५ = साधारण ४६.६६ मिनिट
१० मुहूर्त कालावधी
 ४६६.६७ = ४६ मिनिट = ७ तास ४६ मिनिट
११ व मुहूर्त म्हणजेच विजय मुहूर्ताची सुरवात
 ६:३० + ७:४७ = १४:१६
विजय मुहूर्त अखेर
 १४:१७ + ०:४६ =  १५:०३
विजय मुहूर्त कालावधी
 १४:१६ ते १५:०३

अपराजिता पूजा

आश्‍विन शुक्ल दशमीला प्रस्थान काढण्यापूर्वी अपराजितादेवीचे पूजन करतात. त्यासाठी अक्षतादिकांचे अष्टदल काढून त्यावर मृत्तिकेची मूर्ती स्थापन करतात.
'ॐ अपराजितायै नम:'
असे म्हणून तिची स्थापना, नंतर
'ॐ क्रियाशक्‍तये नम:'
असे म्हणून तिच्या उजव्या बाजूस 'जया' देवीची स्थापना आणि
'ॐ उमायै नम:'
असे म्हणून डाव्या बाजूस 'विजया' देवीची स्थापना करून आवाहनादी पूजा करावी, आणि
'चारुणा मुखपद्मेन विचित्रकनकोज्ज्वला ।
जयादेवी भवे भक्‍ता सर्वकामान् ददातु मे ॥
कांचनेन विचित्रेन केयूरेण विभूषिता ।
जयप्रदा महामाया शिवभावितमानसा ।
विजया च महाभागा ददातु विजयं मम ।
हरेण सुविचित्रेण भास्वत् कनकमेखला ।
अपराजिता रुद्ररता करोतु विजयं मम ।'
अशा मंत्रांनी जया, विजया आणि अपराजित यांची प्रार्थना करावी. हळदीने रंगविलेल्या वस्त्रात दूर्वा व तीळ बांधून दोर बनवावा. नंतर तो दोर
'सदा पराजिते यस्मात्त्वं लतसत्तमास्मृता ।
सर्वकामार्थसिद्ध्यर्थं तस्मात्त्वां धारयाम्यहम् ॥'
अशा मंत्राने अभिमंत्रित करावा आणि
'जयदे वरदे देवि दशम्यामपराजिते ।
धारयामि भुजे दक्षे जयलाभाभिवृद्धये ॥'
असे म्हणून तो दोरा उजव्या हातात धारण करावा.

कूष्मांड दशमी

आश्‍विन शुक्ल दशमीचे नाव. हिच्या व्रताचा विधी पुढीलप्रमाणे - शिव, दशरथ व लक्ष्मी यांची कोहळ्याच्या फुलांनी पूज व चंद्राला अर्घ्य. व्रतावधी दशमीपासून त्याच महिन्याच्या व. चतुर्थीपर्यंत.

शुक्र पश्चिम लोप

शुक्र या ग्रहाचा पश्चिम दिशेला असत लोप होत आहे.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच अस्तअसे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला उदयअसे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे कालांशअसे संबोधतात.
शुक्राचा कालांश ८ अंश असतो.
शुक्र हा अतिशय तेजस्वी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर किंवा सायंकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर सुमारे तीन तासापर्यंत दिसू शकतो.
शुक्र हा शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५

दशमी श्राद्ध

अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळेश्राद्धतिथी आश्विन शुक्ल १० असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ:
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment