Monday, 29 October 2018

दिनविशेष - ४ नोव्हेंबर २०१८


तिथी
आश्विन कृष्ण १२ (२५:२५)
वार
रविवार
नक्षत्र
उत्तराफाल्गुनी (२१:३५)
योग
वैधृति (२४:४१)
करण
कौलव (१४:१८), तैतिल (२५:२५)


भागवत एकादशी

प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात.
एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते.
एकादशीव्रत स्मर्तांसाठी पारणाप्रधान आहे आणि भागवतांना उपोषणप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी उपोषण करावे. भागवतांना उपोषणाचे दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमी वेध होत असेल म्हणजे एकादशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदय काळी (१ तास ३६ मिनिट) दासाहामी असेल तेव्हा दशमीविद्ध एकादशीचा दिवस सोडून द्वादशीचे दिवशी भागवत सांप्रदायांनी एकादशी व्रत करावे असा मुख्य नियम आहे. अशा वेळेस त्रयोदशी दिवशी पारणे होईल.

वसुबारस/ गोवत्स द्वादशी / वछबाँछ

आश्‍विन कृष्ण द्वादशीला हे व्रत करतात. यासाठी प्रदोषव्यापिनी तिथी मानली जाते. जर दोन्ही दिवस प्रदोषव्यापिनी असेल अगर दोन्ही दिवस नसेल, तर
'वत्सपूजा वटश्‍चैव कर्तव्ये प्रथमेऽदिने'
यानुसार व्रत पहिल्याच दिवशी करतात. संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायवासरांची गंधादी उपचारांनी पूजा करून-
'क्षीरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते ।
सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ।'
हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि
'सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनी ।'
अशी प्रार्थना करावी. त्या दिवशीच्या जेवणात गाईचे दूध, दही, तूप, ताक, खीर, तसेच तेलात तळलेली भजी इ. पदार्थ असू नयेत.
या तिथीला 'वसुबारस' असेही म्हणतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गाईची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात -
'तत: सर्वमये देयि सर्वदेवैरलङ्‌कृते ।
मतर्ममाभिलषितं सफलं कुरु नंदिनि ॥'
या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ खात नाहीत. गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. गाईला उडदाचे वडे,  भात,  गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला 'वछबाँछ' असे म्हणतात.
समुद्रमंथनात पाच  कामधेनु उत्पन्न झाल्या. त्यातील नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हे व्रत आहे.

कृष्णद्वादशी / वासुदेव द्वादशी

या द्वादशीस उपवास, वासुदेवाची पूजा करतात. या तिथीस 'वासुदेव द्वादशी' असेही नाव आहे.

गुरुद्वादशी

आश्‍विन कृष्ण द्वादशीस 'गुरुद्वादशी' असे म्हणतात दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय.
आश्‍विन वद्य द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥
या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.

नीरांजन द्वादशी

आश्‍विन कृष्ण द्वादशीला प्रात:स्नानादि होताच काशाच्या चकचकीत ताम्हणात गंध, पुष्प, अक्षता, पाण्याने भरलेले भांडे इ. ठेवून मग त्या ताम्हणाने देव, ब्राह्मण, आपल्यापेक्षा वयाने मोठे, आई-वडील, तसेच घोडे इ.ना ओवाळावे. लागोपाठ असे पाच दिवस केल्यास अक्षय फलप्राप्ती होते.

अमृत योग

२१:३५ नंतर रविवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


दग्ध योग

२५:२५ पर्यंत रविवारी द्वादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी आश्विन कृष्ण १२ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment