तिथी
|
भाद्रपद कृष्ण १४ (११:३२)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१३:३३)
|
योग
|
ब्रह्मा (१७:२५)
|
करण
|
शकुनि (११:३२), चतुष्पाद
(२२:२२)
|
सर्वपित्री अमावस्या
या भाद्रपद अमावस्येदिवशी
सर्व पितरांचे श्राद्ध करतात.
दर्श अमावस्या
अपराण्हकाली जास्त
मानाने असणाऱ्या अमावस्येलाच "दर्श अमावस्या" असे म्हणतात. अमावस्या
ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
सोमवती अमावस्या
सोमवारी अमावस्या तिथी
असल्यामुळे ११:३२ नंतर सोमवती अमावस्या योग होत आहे.
भादवी पोळा
काही भागात श्रावणी, तर काही भागात भादवी
(भाद्रपद महिन्यातील) पोळा सण साजरा होतो. पोळा सणात ‘बैल' हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या
बरोबरीने मेहनत करणारा, त्याच्या सुख-दुःखाचा साथीदार असलेला बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. या
मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळा सण साजरा केला
जातो.
कुशग्रहणी
भाद्रपद अमावस्येचे नाव. या
दिवशी दर्भ कापून धर्मकृत्यांसाठी त्यांचा संचय करावा. असे सांगितले आहे.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
गजच्छाया पर्व
१३:३३ ते सूर्यास्त गजच्छाया
योग आहे.
भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला
हस्त नक्षत्र असता सूर्य व चंद्र यांचा योग होणे, यास गजच्छाया पर्व म्हणतात
या दिवशी दान, श्राद्धादी कर्मे केली असता अनंत फलाची प्राप्ती होते.
वद्य पक्षातील त्रयोदशीस
चंद्र मघा नक्षत्रात आणि सूर्य हस्त नक्षत्रात असेल, तर त्या योगालाही गजच्छाया
म्हणतात. सूर्य ग्रहणाच्या वेळीही गजच्छाया योग असतो.
अमावस्या श्राद्ध
अपराण्ह काळी अमावस्या तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी अमावस्या असेल तर या दिवशी महालय करावा.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment