तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल ७ (२८:१६)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
शततारका (२२:४२)
|
योग
|
वज्र (२५:२४)
|
करण
|
गरज (१५:०६), वणिज (२८:१६)
|
अचला सप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा माघ शुक्ल सप्तमीस हे व्रत करतात.
उदय सप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीस हे नाव आहे. हे एक तिथीव्रत आहे. व्रतावधी एक वर्ष.
यात प्रत्येक महिन्यात सूर्याची निरनिराळ्या नावांनी पूजा करतात.
त्रितय सप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला हस्तनक्षत्र असेल तर जगत्प्रसूती सूर्यनारायणाची
गंधपुष्पादींनीं उत्तम प्रकारे पूजा करावी व व्रत आचरावे. असे एक वर्षपर्यंन्त
प्रत्येक शुक्ल सप्तमीला केले तर चांगल्या कुळात जन्म, स्थायी आरोग्य आणि येथेच्छ धन
प्राप्त होते.
निक्षुभार्क चतुष्टय
१) मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी व सप्तमीला उपवास, सूर्यपूजन आणि अष्टमीला भोजन,
२) केवळ कृष्ण सप्तमीला उपवास व सूर्यपूजन,
३) सप्तमीला निराहार उपोषण व पिठाचा हत्ती बनवून अर्पण करणे आणि
४) मार्गशीर्ष किंवा माघ कृष्ण सप्तमीला दृढ व्रतधारी होऊन उपोषण, यथाविधी पूजन आणि एक
वर्ष लोटल्यावर पुन्हा गंधादींनीं सूर्यपूजा, ब्राह्मणांना मणिमुक्ता, भोजनादी देउन स्वतः
भोजन करणे. अशा प्रकारे व्रत केले असता भ्रूणहत्यादी पापे दूर होतात.
नंदा सप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला सूर्याचे पूजन करुन दही-भाताचा नैवेद्य दाखवावा.
उपवास करावा. असे केल्याने सर्व प्रकारे आनंदीआनंद होतो.
भद्रा सप्तमी
याच मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला सूर्याला दूध, तूप, व उसाचा रस यांनी स्नान घालावे आणि
उपवास करावा, अष्टमीला पारणे करून भोजन करावे.
मित्रसप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला प्रथम श्मश्रू करून घेऊन स्नान करावे व नंतर उपवास
करावा. सूर्याची षोडशोपचार पूजा करून ब्राह्मणभोजन घालावे. मधुमिश्रित मधुरान्नाने
स्वतः भोजन करावे. याविषयी ब्रह्मपुराणात सांगितले आहे की, सूर्याचा कोणी निर्माता नाही. तो
विष्णूचा उजवा नेत्र व अदिती आणि काश्यपचा पुत्र होय. त्याला मित्र असे नामाभिधान
आहे. म्हणून या दिवशी मित्रसप्तमीचा उपवास करावा. फलहार करावा आणि अष्टमीच्या
दिवशी ब्राह्मणांना व नटनर्तकादिकांना भोजन वाढून मधुयुक्त अन्नाचे स्वतः सेवन
करावे.
विष्णुसप्तमी
मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला रक्तचंदन आणि फुले यांनी भगवान विष्णूची पूजा करावी
व वड्याचा नैवेद्य दाखवावा आणि व्रत करावे. या व्रताने अभीष्टसिद्धी होते.
दग्ध योग
२८:१६ नंतर शुक्रवारी
अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
भद्रा
२८:१६ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ७ असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment