तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल ६ (२५:४९)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (१९:४५)
|
योग
|
हर्षण (२४:३७)
|
करण
|
कौलव (१२:२९), तैतिल (२५:४९)
|
चंपाषष्ठी / मार्तंड भैरवोत्थापन / स्कंध षष्ठी
या दिवशी खंडोबाचे नवरात्र
संपते. चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर
देवासमोर ठेवलेले ताम्हण उचलून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करावा.
ताम्हण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ताम्हणातील हळद उडवावी
(भंडारा) व नंतर खोबरे प्रसाद म्हणून वाटावे. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची
भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटीबुधलीने ओवाळून
आरती करावी. सवाष्ण-ब्राह्मण जेवावयास बोलवावे.
हे सहा दिवस रोज एक फुलांची
माळ खंडोबाला वाहावी.
यामागे एक कथा आहे. मार्तंड
भैरवाचे मणी व मल्लासुर या राक्षसांबरोबर युद्ध चालू असताना श्री महादेवाला विजय
मिळावा म्हणून सप्तऋषींनी मार्तंडभैरव या देवतेचे पूजन केले. जसजसा देवसेनेचा विजय
होऊ लागला, तसे एक प्रत्येक दिवशी एक विजयमाळ देवाला वाहिली गेली. तोच विधी आपण
घरी बसवलेल्या नवरात्रात करतो अशी मान्यता आहे. (काही ठिकाणी माळेची पद्धत नसते.)
ज्या दिवशी देवांना विजय मिळाला, त्या दिवशी देवांचे विधीपूर्वक पूजन करून
मार्तंडभैरवाचा जयघोष केला, तेच आपण तळी भरणे यातून करतो. देवांचा विजय झाल्यावर
ऋषीमुनींनी मार्तंडभैरवाला अनेक सुवर्ण दिव्यांनी ओवाळले. म्हणून तळी भरल्यानंतर
दिवटी-बुधली वापरून देवांना ओवाळावे.
या सणाला
मार्तंडभैरवोत्थापन / स्कंध षष्ठी असेही म्हणतात.
दग्ध योग
२५:४९ पर्यंत गुरुवारी षष्ठी
तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
घबाड
१९:४५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग
आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: जेष्ठा
चंद्र नक्षत्र : धनिष्ठा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते
चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल
प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८
+ ६ = २४
आता ७ ने
भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून
घबाड.
षष्ठी श्राद्ध
अपराण्ह काळी षष्ठी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ६ असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment