तिथी
|
कार्तिक कृष्ण १४ (१२:१२)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२८:३५)
|
योग
|
सुकर्मा (२१:३६)
|
करण
|
शकुनि (१२:१२), चतुष्पाद
(२४:२८)
|
गुरु पूर्व दर्शन
गुरु या ग्रहाचा उदय होत
आहे. आता पूर्वेकडे गुरुचे दर्शन होऊ शकेल.
गुरु या ग्रहाचा पश्चिमेकडे
लोप होत आहे.
ग्रहांचे
सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून
ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते.
त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून
प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच
ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात.
गुरुचे कालांश ११०
आहे.
गुरु
हा आकाराने मोठा असा शुभ ग्रह आहे.
गुरु शुभग्रह असल्यामुळे तो
अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही
दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे
म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
|
दिशा
|
दिवस
|
बालत्व
|
पूर्वेस उदय
|
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
|
बालत्व
|
पश्चिमेस उदय
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पूर्वेस अस्त
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पश्चिमेस अस्त
|
१५ / १०/ ७ / ५
|
कामावाप्तीव्रत
या तिथीस महाकालाची पूजा
करतात.
फल - कामनापूर्ती.
जलकृच्छ्रव्रत
कार्तिक कृष्ण चतुर्दशीस
विष्णुपूजा व पाण्यात उभे राहून उपवास करणे, असा या व्रताचा विधी आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.
प्रायश्चित्त म्हणूनही हे
व्रत करतात. त्यात एक महिनाभर केवळ सातूचे पीठ पाण्यात कालवून खायचे असते. एक दिवस
व एक रात्र काहीही न खात पाण्यात बुडून राहून वरुणाच्या मंत्राचा जप केला असत
वर्षभर केलेया पापांचे क्षालन होते, असे सांगितले आहे. दिवसा उभे राहून व रात्री न
झोपता पाण्यात काळ कंठावा व दुसर्या दिवशी १००८ वेळा गायत्रीमंत्राचा जप करावा, असाही पर्याय सांगितला आहे. या व्रताला उदकृच्छ्र, तोयकृच्छ्र, वरुणकृच्छ्र अशीही अन्य नावे आहेत.
दर्श अमावस्या
अपराण्हकाली जास्त
मानाने असणाऱ्या अमावस्येलाच "दर्श अमावस्या" असे म्हणतात. अमावस्या
ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक
फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्श श्राद्ध
दर्शाच्या दिवशी केले
जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध
नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
अमावस्या श्राद्ध
अपराण्ह काळी अमावस्या
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक कृष्ण ३० असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि
नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता
येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment