Monday, 31 December 2018

दिनविशेष - २ जानेवारी २०१९


तिथी
मार्गशीर्ष कृष्ण १२ (२६:११)
वार
बुधवार
नक्षत्र
विशाखा (९:३९)
योग
शूल (२६:०३)
करण
कौलव (१३:४६),  तैतिल (२६:११)


तिथीवासर/ हरीवासर

द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.
७:३९ पर्यंत तिथीवासर आहे.

उभयद्वादशी

हे एक तिथिव्रत आहे. व्रतारंभ मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला होतो. दर द्वादशीला विष्णूच्या केशव, नारायणादी एकेका रूपाची पूजा करतात. याप्रमाणे वर्षभरात चोवीस रूपांची पूजा होते.

भृगूव्रत

हे तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावच्या बारा देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.

सुरूप द्वादशी

मार्गशीर्ष कृष्ण पुष्पयुक्त द्वादशीच्या आदल्या दिवशी रात्री जितेन्द्रिय राहून विष्णूचे ध्यान करावे आणि श्‍वेत धेनूच्या शेणाच्या गोव‍र्‍या पेटवून त्या अग्नीत घृतादियुक्त तिळाच्या १०८ आहुती देऊन हवन करावे. दुसरे दिवशी नदी, तलाव आदी जलाशयावर स्नान करुन भगवंताच्या सोन्याच्या प्रतिमेची तिळाच्या पात्रात ठेवून पूजा करावी. तीळ, फळे यांचा नैवेद्य दाखवावा. नंतर
'नमः परमशान्ताय विरूपाक्ष नमोस्तुते'
या मंत्राने अर्घ्य द्यावा. ब्राह्मणभोजन घालून ती मूर्ती त्यास दान द्यावी.

अमृतयोग

९:३९ नंतर बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्याने अमृतसिद्धि योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष कृष्ण १२ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment