Thursday, 20 December 2018

दिनविशेष - २१ डिसेंबर २०१८


तिथी
मार्गशीर्ष शुक्ल १४ (२६:०९)
वार
शुक्रवार
नक्षत्र
रोहिणी (२५:२२)
योग
साध्य (१६:२४)
करण
गरज (१५:२६), वणिज (२६:०९)


मकरायन

२७:५२ ला रवि सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे.

उत्तरायण आरंभ

सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, म्हणजे उत्तरायण सुरु होते. तिथपासून सहा राशी भोगून होईपर्यंत उत्तरायण असते.
या साठी पुण्यकाळ सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्या पासून पुढे ४० घटिका असा सांगितला आहे. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १६:१४ ते सूर्यास्त असा आहे.

उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस

हा उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस आणि असून रात्र सर्वात मोठी असते.

सौर शिशिरऋतु प्रारंभ

भारतीय सौर काल गणनेनुसार शिशिर ऋतु आरंभ होत आहे.

पिशाच्च मोचन यात्रा

ही सांवत्सरिक यात्रा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीला निघते. या दिवशी कपर्दीश्‍वरा ( शिव )- समीप स्नान करून यात्रा करावी. ही यात्रा करणाराला अन्यत्र मृत्यू आला तरी तो पिशाच-योनीत जात नाही, आणि तीर्थादी ठिकाणी घेतलेल्या दानाचे पाप नष्ट होते.

शिवचतुर्दशी व्रत

शास्त्रामध्ये या व्रताचे विशेष विधान सांगितलेले आहे. या व्रतात मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला एकभुक्त राहून चतुर्दशीला निराहर उपवास करावा. शिवाची पूजा करावी. पुजनात स्नान घातल्यानंतर

'शिवाय नमः पादौ ।
सर्वात्मने शिरः ।
त्रिनेत्राय ललाटम् ।
हराय नेत्रयुग्मम् ।
इन्दुमुखाय मुखम् ।
श्रीकंठाय स्कन्धौ ।
सद्यौजाताय कर्णो ।
वामदेवाय भुजौ ।
अघोरहृदयाय हृदयम ।
तत्पुरुषाय स्तनौ।
ईशानाय उदरम् ।
अनंतधर्माय पार्श्‍वम् ।
ज्ञानभूताय कटिम् ।
अनंतवैराग्यसिंहाय ऊरू ।
प्रधानाय जंघे ।
व्योमात्मने गुल्फौ ।
व्युप्तकेशात्मरूपाय पृष्ठम् अर्चचामि ।

याप्रमाणे अंगपूजा करून
'नमः पुष्टयै, नमस्तुष्टयै ।
म्हणून पार्वतीपूजन करावे. त्यानंतर

प्रीयतां देवदेवोऽत्र सद्योजातः पिनाकधृक्'

अशी प्रार्थना करावी व वृषभ, सूवर्ण , जलपूर्ण कलश, गंध, पंचरत्‍न, आणि अनेक प्रकारचे भोजनपदार्थ ब्राह्माणाला अर्पण करावे व थोडे तूप सेवन करून भूमीवर झोपावे. नंतर पौर्णिमेला ब्राह्मणांची पूजा करून त्यास जेवू घालावे. अशा प्रकारे वद्य चतुर्दशीसही करावे, पुढे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही चतुर्दशींना शिवपूजनादी केल्यावर
मार्गशीर्षात
गोमूत्र
पौषात
गोमय
माघात
गोदुग्ध
फाल्गुनात
गोदधी
चैत्रात
गोघृत
वैशाखात
कुशोदक
ज्येष्ठात
पंचगव्य
आषाढात
बिल्व
श्रावणात
जव
भाद्रपदात
गोशृंगजल
आश्‍विनात
जल
कार्तिकात
काळे तीळ

याप्रमाणे पदार्थ यथाविधी भक्षण करावे.

शिवपुजनास निरनिराळ्या महिन्यात निरनिराळी फुले घ्यावीत.
मार्गशीर्षात
कमळे
पौषात
मंदाराची फुले
माघात
मालती
फाल्गुनात
धोतरा
चैत्रात
निर्गुडीची
वैशाखात
अशोक
ज्येष्ठात
मल्लिका
आषाढात
पाटल
श्रावणात
अर्कपुष्प
भाद्रपदात
कदंब
आश्‍विनात
शतपत्री
कार्तिकात
उत्पल (कमल)

अशा तर्‍हेने पूजन केल्याने देवदेवेश महादेव प्रसन्न होतात व महाफल प्राप्त होते. शास्त्रात म्हटले आहे की, हे व्रत केल्याने महाफल मिळते.

यमघंट योग

२५:२२ पर्यंत शुक्रवारी रोहिणीनक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.


भद्रा

२६:०९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.

ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
भद्रा मुख (निंद्य काळ)
शुक्ल चतुर्थी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल अष्टमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
शुक्ल एकादशी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
पोर्णिमा
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण तृतीया
चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण सप्तमी
तृतीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण दशमी
द्वितीय पादाच्या पहिल्या पाच घटिका
कृष्ण चतुर्दशी
प्रथम पादाच्या पहिल्या पाच घटिका


तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ मनाला जातो.
भद्रेची तिथी
भद्रा पुच्छ
शुक्ल चतुर्थी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल अष्टमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
शुक्ल एकादशी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
पोर्णिमा
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण तृतीया
तिसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण सप्तमी
दुसऱ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण दशमी
पहिल्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका
कृष्ण चतुर्दशी
चौथ्या पादाच्या शेवटच्या तीन घटिका

योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

चतुर्दशी श्राद्ध

अपराण्ह काळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल १४ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment