तिथी
|
मार्गशीर्ष शुक्ल १० (७:५७)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (२८:३८)
|
योग
|
परिघ (२३:५०)
|
करण
|
गरज (७:५७), वणिज (१९:५३)
|
दशादित्यव्रत
ज्या शुक्ल
दशमीला रविवार असेल अशा कोणत्याही महिन्यातील दशमीला हे व्रत करतात. असे असले तरी
मार्गशीर्ष, माघ आणि वैशाख महिन्यात प्रारंभ केला असता अधिक
फल मिळते.
मार्गशीर्ष
शुक्ल दशमीस रविवार असेल तर नदी, तलाव, अगर ओढ्याकाठी जाऊन
प्रातःस्नानादी नित्यकर्मे करावी. पुन्हा मध्यान्हस्नान करुन घरी यावे आणि
देवता-पितृगण तृप्त करुन एक वेदी बनवावी.
१) त्या वेदीवर
१२ पाकळ्य़ांचे कमळ काढावे व त्यावर सुवर्णाची सूर्यमूर्ती स्थापावी. तिचे
सूर्यमंत्रोच्चारपूर्वक आवाहन, आसन, पाद्य अर्घ्य आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध,
अक्षत, पुष्प, धूप, दीप,
नैवेद्य, आचमन फळ, तांबूल, दक्षिणा आणि विसर्जन अशा उपचारांनी पूजन करावे.
१)
गाईच्या शेणाने
सारवलेल्या वेदीवर काळ्या रंगाने
१ दुर्मुखी,
|
२ दीनवदना,
|
३ मलिना,
|
४ सत्यनाशिनी,
|
५ बुद्धिनाशिनी,
|
६ हिंस्त्रा,
|
७ दुष्टा,
|
८
मित्रविरोधिनी,
|
९
उच्चाटनकारिणी,
|
१० दुश्चिंतप्रदा
|
या पुतळ्या लिहून त्यांच्या नाममंत्रोच्चारपूर्वक त्यांची पूजा-प्रतिष्ठा
करावी आणि
नित्यं पापकरे पापे देवद्विजविरोधिनी ।
गच्छ त्वं दुर्दशे देवि नित्यं शास्त्रविरोधिनि ॥
अशी प्रार्थना करुन विसर्जन करावे.
२)
सूत किंवा
रेशमाच्या १० धाग्यांचा बनविलेला दोरा घेऊन त्याला दहा गाठी माराव्या. आवाहनादी
षोडशोपचारे त्याची पूजा करावी. नंतर
ततः समापयेद् देवं भास्करं च दशाकरम् ।
दुर्दशानाशनं देवं चिंतयेद् विश्वरूपिणम् ॥
अशी सूर्याची प्रार्थना करावी. दक्षिणेसहित १० फळे घेऊन
भास्करो बुद्धिदाता च द्रव्यस्थो भास्करः स्वयम् ।
भास्करस्तारकोमाभ्यां भास्कराय नमो ऽ स्तु ते. ॥
म्हणून वायनप्रदान करून भोजन करावे. आणि
३)
वेदीवर चंदनाच्या
गंधाने
१ सुबुद्धिदा
|
२ सुखकारिणी
|
३
सर्वसंपत्तिदा
|
४ इष्टभोगदा
|
५ लक्ष्मी
|
६ कांतिदा
|
७ दुःखनाशिनी
|
८ पुत्रप्रदा
|
९ विजया
|
१० धर्मदायिनी
|
अशा १० पुतळ्या लिहून त्यांचे नाममंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचारे पूजन करावे आणि
विश्वद्धवसनां देवीं सर्वाभरणभूषिताम् ।
ध्यायेद्दशदशां देवीं वरदाभयदायिनीम् ॥
अशी प्रार्थना करुन भोजन करावे. दुर्दशा नाहीशी होते.
दुर्दशा का प्राप्त होते ?'
असा प्रश्न नारदमुनींनी विचारला असता कश्यपमुनी म्हणाले, 'धान्याचा कोंडा, भस्म, आणि मुसळ यांना ओलांडले असता; कुमारी, धोबीण, व वृद्ध स्त्री यांच्याशी
संग केला असता; अयोनी (मुख, हस्त, गुद) किंवा ब्राह्मणी आदिकांपाशी ब्रह्मचर्याचा भंग केला
असता; सायंकाळी, प्रभातकाळी, अगर पर्वकाळी रजस्वला स्त्रीच्या जवळ गेले असता; संकटकाळी माता, पिता किंवा धनी यांचा
त्याग केला असता आणि आपले परंपरागत धर्म, कर्म व सदाचार यांचा
त्याग केला असता दुर्दशा प्राप्त होते. तेव्हा न्यायमार्ग, आणि सत्कर्म यातच
रत असावे. संकटकाळी दशादित्यव्रत करावे. नलराजा आणि पांडव यांनी संकटकाळी हेच व्रत
केले होते.
धर्मत्रयव्रत
१) मार्गशीर्ष शुक्ल दशमीला उपवास करुन धर्माची पूजा करावी. तुपाची
आहुती द्यावी आणि ब्राह्मणभोजन घालावे.
२) कृष्ण पक्षातील दशमीला धर्माची पूजा करुन व्रत
करावे.
३) दोन्ही दशमींना धर्माची यथाविधी पूजा करुन व्रत
केले असता या व्रतयात्रेने पापांचा नाश होऊन आयुरारोग्य, आणि ऐश्वर्य
यांची अभिवृद्धी होते.
पदार्थदशमी
मार्गशीर्ष शुक्ल
दशमीपासून एक वर्षपर्यंत दर शुक्ल दशमीला इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरूण, वाय़ू, कुबेर, ईशान, ब्रह्मा, आणि अनंत अशा दहा दिशापतींची गंधपुष्पादिकांनी पूजा करावी.
वर्ष पूर्ण झाल्यावर ब्राह्मणभोजन घालावे, म्हणजे व्यापार, व्यवासाय, व्यवहार यामध्ये सफलता
प्राप्त होते. शिवाय विद्याधनादीची वृद्धी होते आणि शत्रूंचा नाश होतो.
मोक्षदा (स्मार्त) एकादशी
शुद्धा एकादशी, तसेच नियमादिविषयक निर्णय पूर्वीप्रमाणे घेऊन मार्गशीर्ष शुक्ल दशमीच्या दिवशी मध्यान्ही जवाची भाकरी व मुगाची
डाळ याचे एकच वेळ भोजन करावे आणि एकादशीच्या दिवशी प्रातःस्नानादी नित्य कर्मे
उरकून उपोषण करावे. श्रीविष्णूची पूजा करावी. रात्री जागर करून द्वादशीला एकभुक्त
राहून पारणे करावे. ही एकादशी मोहाचा नाश करणारी आहे. म्हणून हिला 'मोक्षदा' एकादशी म्हणतात.
अमृत योग
२८:३८ पर्यंत मंगळवारी
अश्विनी नक्षत्र असल्यामुळे होणारा परंतु गृहप्रवेशासाठी वर्ज असा अमृतसिद्धी योग
होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
भद्रा
१९:५३ नंतर भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भगवान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चार चार वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष मानू नये.
भद्रा मुख (निंद्य काळ) व पुच्छ:
विष्टि करणाचा एकंदर जो वेळ
आहे त्याचे चार भाग करावे. त्या प्रत्येक भागाला ‘पाद’ असे म्हणतात.
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. हा काळ कोणत्याही
शुभकार्यास अत्यंत निद्य असतो.
भद्रेची तिथी
|
भद्रा मुख (निंद्य काळ)
|
शुक्ल चतुर्थी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
शुक्ल एकादशी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
पोर्णिमा
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण तृतीया
|
चौथ्या पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
तृतीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण दशमी
|
द्वितीय पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
प्रथम पादाच्या पहिल्या
पाच घटिका
|
तसेच विशिष्ट प्रहरातील
काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून हा काळ प्रसंगविशेषी शुभ
मनाला जातो.
भद्रेची तिथी
|
भद्रा पुच्छ
|
शुक्ल चतुर्थी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
शुक्ल अष्टमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
शुक्ल एकादशी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
पोर्णिमा
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण तृतीया
|
तिसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण सप्तमी
|
दुसऱ्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण दशमी
|
पहिल्या पादाच्या
शेवटच्या तीन घटिका
|
कृष्ण चतुर्दशी
|
चौथ्या पादाच्या शेवटच्या
तीन घटिका
|
योग्य व वर्ज्य कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
एकादशी श्राद्ध
अपराण्ह काळी एकादशी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल ११ असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment