तिथी
|
कार्तिक कृष्ण ३० (१२:५०)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (३०:०६)
|
योग
|
धृति (२१:०५)
|
करण
|
नाग (१२:५०), किंस्तुग्घ्न
(२५:२१)
|
केदारगौरीव्रत
याचा आरंभ कार्तिक
अमावस्येस करतात. त्या दिवशी गौरी व केदार यांची पूजा करतात. हे व्रत दक्षिणेत
प्रसिद्ध आहे.
गौरीतपव्रत
या व्रताचा आरंभ कार्तिक
अमावास्येला करतात. या दिवशी प्रात:स्नान आदि झाल्यावर हातात गंध, अक्षता, फुले, दूर्वा आणि उदक घेऊन
'ईशार्द्धंगहरे देवि करिष्येऽहं व्रतं तव ।
पतिपुत्रासुखावप्तिं देहि
देवि नमोऽस्तु ते ॥'
असा संकल्प करावा व
मध्यान्ही सूर्यनारायणास अर्घ्य द्यावे आणि
'अहं देवि व्रतमिहं कर्तुमिच्छामि शाश्वतम् ।
तवाज्ञया महादेवि
निर्विघ्नं कुरु तत्र वै ।'
अशी प्रार्थना करावी. नंतर
गौरीपूजन व उपवास करावा. पूजेचे आवाहनादी सहा उपचार झाल्यावर अंगपूजा करून गंधपुष्पादी
इतर दशोपचारांनी पूजन करावे आणि गौरीच्या उजव्या बाजूस गणेश व डाव्या बाजूस स्कंद
यांचे पूजन करावे. नंतर तांब्याच्या अगर मातीच्या आठ पणत्यांत तुपाचे दिवे ठेवावे, रात्रभर (सूर्योदय होईतो ) ते दिवे तेवत ठेवावे. ब्रह्ममुहूर्तावर (प्रतिपदे
दिवशी सकाळी ) स्नान करून नंतर ब्राह्मण दांपत्याची पूजा करावी. तांबे, पितळ व शिसे यांच्या तीन पात्रांत गूळ, काही पक्वान्ने, तीळ-तांदूळ व सौभाग्यद्रव्ये ठेवुन ते दिवे त्यावर ठेवावे आणि बगळे, कावळे आदी पक्षी ओरडू लागेपर्यंत ते न घेता तिथे बसून राहावे.
पक्षी ओरडू लागण्यापूर्वी
उठल्यास सौभाग्य नष्ट होते. अशातर्हेने, पहिल्या वर्षी अमावास्येपासून,
दुसर्या वर्षी प्रतिपदेपासून, तिसर्या वर्षी द्वितीयेपासून या क्रमाने व्रत करीत सोळाव्या वर्षाच्या
मार्गशीर्ष पौर्णिमेला आठ ब्राह्मण दांपत्ये बोलावून मध्यान्ही सुपूजित गौरीजवळ
अष्टदलावर सोम व शिव यांची पूजा करावी आणि तिखट-मिठाचे वडे, गुळपापडी, पुर्या, अनरसे, खीर, तूप, साखर व मोदक अशा आठ पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
या आठ पदार्थांनी भरलेली आठ जोडपाने वाढून दांपत्यांना जेवू घालावे, त्यांना वस्त्रालंकार वगैरे अर्पण करावे. ती अन्नपात्रे झाकणांसह दांपत्यांना
दान द्यावी. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. या व्रताने स्त्रियांना
पुत्रप्राप्ती होते आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
प्रतिपदा श्राद्ध
अपराण्ह काळी प्रतिपदा
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी मार्गशीर्ष शुक्ल १ असेल तर या
दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि
नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता
येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
No comments:
Post a Comment