तिथी
|
माघ शुक्ल १२ (२१:२७)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (२६:५८)
|
योग
|
आयुष्मान (२७:०७)
|
करण
|
बव (९:२७)
|
भीष्मद्वादशी
हे व्रत माघ शुक्ल द्वादशीलाच असते. या व्रताला ब्रह्मार्पण करून ब्राह्मणांना
भोजन द्यावे आणि पारणे करावे. एकादशीप्रमाणेच बाकीचा विधी आहे. हे व्रत वासुदेवाने
प्रथम भीमाला सांगितले, म्हणून त्याला भीमाचे नाव प्राप्त झाले.
शुक्ल दशमीला शरीराला तूप लावून स्नान करावे.
'ॐ नमो नारायणाय'
या मंत्राने विष्णुची पूजा करावी. त्याबरोबर गरुड - गणेशाची पूजा करावी.
एकादशीला पूर्ण उपवास करावा.
द्वादशीला नदीमध्ये स्नान करून घरापुढे मांडव घालावा. एका तोरणाला पाण्याने
भरलेले पात्र टांगावे. त्या पात्राच्या तळाला एक छिद्र पाडावे. त्यातून झिरपणारे
थेंब मस्तकावर घ्यावे. नंतर ऋग्वेदी पुरोहिताकडून होम, यजुर्वेदी पुरोहिताकडून
रुद्रावर्तन आणि सामवेदी पुरोहिताकडून सामगायन करवावे. पुरोहितांना वस्त्रालंकार
देऊन त्यांच सन्मान करावा. हे व्रत करणारा पापमुक्त होतो. या व्रताचे माहात्म्य
वाजपेय आणि अतिरात्र या यागापेक्षाही मोठे आहे, असे सांगितले आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.
तिलद्वादशी
हे व्रत षट्तिला एकादशीप्रमाणेच आहे. यासाठी माघ. शुक्ल द्वादशीला तिलमिश्रित
पाण्याने स्नान करावे. तिळांनी विष्णूपूजन करावे. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
तिळाचाच नैवेद्य दाखवावा. तिळाचेच हवन करावे आणि भोजनात तिळाचेच प्रमाण अधिक असावे, यामुळे स्वाभाविक, आगन्तुक, शारीरिक आणि सांसर्गिक
सर्व व्याधी दूर होतात व सर्व प्रकारचे सुख लाभते.
वराह द्वादशी
एक तिथिव्रत. माघ शुक्ल द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. विष्णूचा अवतार वराह
ही या व्रताची देवता आहे. या व्रताचा विधी - एकादशीला व्रतसंकल्प व पूजा करावी.
एका पात्रात सुवर्णाची, चांदीची किंवा तांब्याची नाणी व सर्व प्रकारची धान्यबीजे घालून त्यावर वराहाची
सोन्याची मूर्ती ठेवावी आणि तिची पूजा करावी. रात्री जागर करावा. द्वादशीला
पूजेतील वराहाची मूर्ती ब्राह्मणाला द्यावी.
फल - सौभाग्य, संपत्ती, सौंदर्य, पुत्र यांची प्राप्ती.
छत्रपती शिवाजीमहाराज
जयंती (तारखेप्रमाणे)
१९ फेब्रुवारी १६३० हा दिवस शिवाजी महाराजाचा जन्म दिवस (तारखेनुसार) म्हणून
साजरा केला जातो.
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर
ग्रेगेरिअन कॅलेंडरप्रमाणे व्यवहार होऊ लागले.
आज ज्या ग्रेगेरिअन कॅलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख
निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी
ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युलिअन कालगणना व ग्रेगेरिअन
कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा
फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार
निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना
शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती त्यानुसारमुळे शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी
व्हावी असे काही जणांना वाटते.
शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी
वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन
वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३०
सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९
फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
मीनायन
११:०२ ला रवि सायन मीन राशीत प्रवेश करत
आहे.
सौर वसंत ऋतु प्रारंभ
भारतीय सौर काल
गणनेनुसार वसंत ऋतु आरंभ होत आहे.
रवि शततारका नक्षत्र
प्रवेश
२८:५३
ला रवि शततारका नक्षत्रात प्रवेश करत आहे .
घबाड
२६:५८
नंतर २८:५३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: धनिष्ठा
चंद्र
नक्षत्र : पुष्य
तिथी:
१३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment