तिथी
|
माघ शुक्ल ११ (२१:३४)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२६:२४)
|
योग
|
प्रीति (२८:१७)
|
करण
|
वणिज (९:४७)
|
जया एकादशी
माघ शुक्ल एकादशीलच 'जया एकादशी' म्हणतात. या एकादशीच्या पुण्यप्रभावाने पिशाचत्व नाहीसे होते.
भौमी एकादशी
माघ शुक्ल एकादशीला सामान्यपणे चंद्र मृगशीर्ष नक्षत्रात असतो. या दिवशी उपवास
करावयाचा असतो आणि द्वादशीच्या दिवशी षट्तिली व्हावयाचे असते. षट्तिलेचे प्रकार
असे –
१)
पाण्यात तीळ घालून स्नान करणे,
२)
तीळ वाटून अंगाला लावणे,
३)
तिळाच्या आहुती देणे,
४)
तिळमिश्रित पाणी पिणे,
५) तिलदान करणे आणि
६) तिळ खाणे.
फल - विष्णुलोकाची प्राप्ती.
पंढरीवारी व्रत
पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शुक्ल
एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शुक्ल
एकादशीस करतात. आणि पंढरपूर हे वारकर्यांच्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्यपीठ आहे. त्यामुळे
आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात. या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद
मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव
संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत
आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे
नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.
पंढरीचे अनादित्व -
वारीची प्रथा –
दर महिन्याच्या वारीस येणार्यांचे नित्यनेम कार्यक्रम:
दर महिन्याच्या शुक्ल दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे
कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस
गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून 'कालाप्रसाद' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग
मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.
निष्ठावंत वारकर्यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी
करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्गीता, काहींच्याबरोबर
तुळशीवृंदावन ही असतात.
'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर ।
नामाचा गजर सोडू नये ।'
असे वारकर्याचे ब्रीद
आहे.
'रामकृष्ण हरि ' हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप
असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध
नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्यांची
बोधचिन्हे होत. वारी करणार्यांना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते. गुरू
माळ देताना शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम:
१)
खरे बोलणे,
२)
परस्त्री मातेसमान मानणे,
३)
काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना
करणे,
४)
मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,
५)
दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,
६)
वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,
७)
नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,
८)
नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि
९)
प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार
पाडणे.
कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर
दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक
समजतात.
घबाड
२१:३४
नंतर २६:२४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: धनिष्ठा
चंद्र
नक्षत्र : आर्द्रा
तिथी:
१२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
९:४७
नंतर २१:३४ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
अशी जन्मली एकादशी ..!!
ReplyDeleteभागवतामध्ये एकादशीविषयी फार रोचक माहिती देण्यात आली आहे. पांडवांपैकी सर्वांत मोठे धर्मराज हे अतिशय कोमल मनाचे होते. मनुष्यहत्या आणि त्यातही आपल्याच नातेवाईकांची हत्या करावी लागल्याने ते व्यथित झाले होते, उदास होते. संकटाच्या वेळी धावून येणारा श्रीकृष्ण याही वेळी त्यांच्याकडे आला. धर्मराजांनी त्याला आपल्या मानसिक अशांततेचे कारण सांगितले आणि त्यावर उपाय विचारला. भगवान श्रीकृष्णाने त्याला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. त्याबरोबर त्याला फल की, स्वत:च्या आप्तमित्रांचा छळ करणे, सज्जनांना त्रास देणे, कुणाची धनसंपत्ती धोक्याने मिळवणे, कुणाचा विश्वासघात करणे, दारावर आलेल्या याचकाला वाईट वागणूक देऊन हाकलून देणे यासारख्या झालेल्या पातकांच्या परिमार्जनासाठी एकादशीचे व्रत करावे.
‘कुंभ’ नावाचा दैत्याचा मुलगा ‘मृदुमान्य’ याने तप करून शिवाला प्रसन्न करवून घेतले आणि त्याला अमरत्वाचा वर मागितला. शिवाने त्याला वर दिला की, आईबापांवाचून जन्म पावलेल्या स्त्रीकडून फक्त, तुझ्या जिवाला धोका राहील, बाकी कुणीही तुझा वध करू शकणार नाही. खरेतर ही गोष्ट अशक्यच होती, त्यामुळे तो मृदुमान्य राक्षस इतरांना त्रास देत सुटला.
त्याने इंद्राला जिंकले, ब्रह्मदेवाला पळवून लावले, विष्णूच्या पाठी तो लागला. त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी युद्ध सुरू केले. शेवटी त्याच्या धास्तीने ब्रह्मदेव-सावित्री, विष्णू-लक्ष्मी, भगवान शंकर-पार्वती तेथून पळाले आणि आवळ्याच्या झाडाला असलेल्या एका ढोलीत त्या सहाही जणांनी आश्रय घेतला. या सहा जणांच्या श्वासोच्छ्वासातून तेथे एका मुलीचा जन्म झाला. तीच ही एकादशी! सर्वांचं तेज एकवटलेली स्त्रीशक्ती. तिने ‘मृदुमान्य’ राक्षसाचा वध केला.
या विजयाने आनंदित झालेले ते सर्वजण प्रथम कैलासावर आणि नंतर वैकुंठात विष्णूकडे गेले. एकादशीचा विजयोत्सव सर्वत्र साजरा झाला.
एकादशीचे पूजन प्रथम कैलासावर नंतर वैकुंठात झाल्याने एखाद्या पंधरवड्यात लागोपाठ दोन दिवस एकादशी आल्यास पहिल्या दिवशी शैवपंथीय आणि दुसर्या दिवशी वैष्णवपंथीय लोक एकादशीचे व्रत करतात.
शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ?
एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या अथवा सज्जनांच्या सहवासात राहणे आणि मन शांत, प्रसन्न आणि पवित्र ठेवणे, हा त्या व्रतपालनाचा मूळ उद्देश आहे.
एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा. दुसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही जेवण द्यावे. द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते.
शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक ठरते, असे पुराणात सांगितले आहे.