तिथी
|
फाल्गुन कृष्ण १० (७:२८), फाल्गुन कृष्ण ११
(२९:२८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
श्रवण (१३:५०)
|
योग
|
सिद्ध (८:३३), साध्य (२९:५५)
|
करण
|
बव (१८:३८)
|
पापमोचानी
(स्मार्त) एकादशी
प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले
जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या
दिवशी उपवास करतात. दुसर्या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत
असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात
पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. (३ एप्रिलला पापमोचनी
स्मार्त व ४ एप्रिलला भागवत एकादशी आहे) भागवत एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते.
वैष्णवलोक भागवत एकादशी पाळतात.
या दोन एकादश्या केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात सविस्तर
विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व
रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले आढळतात.
या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर भरपूर लेखन
केलेले आढळते. प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे
पुढीलप्रमाणे आहेत.
चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे –
कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जया
(जयदा) व आमलकी.
कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी –
वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ति (फलदा), सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी.
या व्यतिरिक्त अधिक मास असेल त्यावेळी २ एकादशी येतात त्यांस कमला एकादशी
म्हणतात.
एकादशीचे नित्य व काम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या
दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य
एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास
करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ.
गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.
काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे – जो कोणी विष्णुपरायण होऊन संसार
सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल
इच्छितो त्याने उभय पक्षातील एकादशीला अन्न ग्रहण करू नये. तुकारामाने एकादशीचे
महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा –
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्वान विष्ठेसमान|
अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग|
करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय रोग|
जन्मव्याधी बळिवंत॥
छंदोदेवपूजा
हे एक एक
स्त्रीव्रत आहे. फाल्गुन कृष्ण एकादशीला स्त्रिया छंदोदेवाची पूजा करतात. त्याला
जलचर प्राण्यांचे मांस, रुचकर खाद्यपदार्थ, केशर, इ. वस्तू समर्पण करतात.
फल -
सौभाग्यप्राप्ती व कामनापूर्ती.
दग्ध योग
२९:३८ नंतर रविवारी द्वादशी
असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
घबाड
७:२८ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: रेवती
चंद्र
नक्षत्र : श्रवण
तिथी:
१५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी
मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
७:२८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment