तिथी
|
फाल्गुन पौर्णिमा (१७:३१)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१९:०७)
|
योग
|
गंड (८:०४)
|
करण
|
बालव (--:--)
|
हुताशनी पौर्णिमा (होळी), होलिका प्रदीपन
सायंकाळी होळी
पेटवून पूजा करावी. होलिकेस प्रदक्षिणा घालून एकदा शंखध्वनि करावा. नारळ भाजून
प्रसाद घ्यावा. घरात त्रास देणाऱ्या जीवकीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या
होळीत टाकण्याची चाल अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे ते जीवाणू नष्ट होतात अशी मान्यता
आहे.
पौराणिक कथा
पौराणिक कथा
हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळी शकणार नाही असा वर होता. म्हणून
हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद
मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला.
ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पोटवून आनंद
व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी
म्हणून होळी पेटवतात.
तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून
देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती
निघून गेली. आजही समाजात वीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात
असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा
धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते
तसाच हा प्रकार आहे.
विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या
जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते.
म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे.
देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर
पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.
गंधव्रत
हे व्रत एक वर्षभर करतात. वर्षभर प्रत्येक पौर्णिमेस उपवास व वर्षाच्या शेवटी
विष्णुमूर्तीला सुगंधी द्रव्याचे विलेपन करून ती ब्राह्मणाला दान देणे, असा याचा विधी आहे.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत
म्हटले आहे
महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना
सात महर्षी जन आणि त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच
स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी
भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने
उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
छायाकल्प चंद्रग्रहण
ReplyDelete---------------
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या छायेत येतो तेव्हा चंद्रग्रहण होते हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतरामुळे पृथ्वीच्या सावलीचे २ भाग होतात. १) गडद किंवा दाट छाया २) विरळ किंवा पडछाया.
चंद्र जेव्हा दाट छायेत असतो तेव्हा चंद्रबिंब ग्रस्त झालेले दिसते. मात्र जेव्हा पडछायेत असतो तेव्हा ते ग्रस्त न होता केवळ धूसर झालेले दिसते. अशा ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणले जाते. 23 मार्च रोजी छायाकल्प ग्रहण असल्याने आपल्याला चंद्रबिंब धूसर झालेले पाहावयास मिळेल.
तांत्रिकदृष्ट्या जरी छायाकल्प हे ग्रहणच असले तरीही धर्मशास्त्रानुसार अशा ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम कोणाही व्यक्तीने अगदी गर्भवती स्त्रीयांनी देखील पाळण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट सांगितलेले असल्याने 23 मार्च रोजी होत असलेल्या छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत.
23 मार्च रोजीच्या ग्रहणाचा केवळ मोक्ष भारतामधून दिसणार असल्याने सायंकाळी 7/25 पर्यंत चंद्रबिंब धूसर दिसेल व त्यानंतर नेहमीप्रमाणे पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र दिसू लागेल.
23 मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण व होळी एकत्र असली तरी वर सांगितल्याप्रमाणे या ग्रहणाचे कोणतेही धर्मशास्त्रीय नियम नसल्याने होळीचा सण आपल्या परंपरेप्रमाणे साजरा करता येईल. मात्र सध्या दुष्काळाची स्थिती असल्याने या अडचणीच्या प्रसंगी तो सण प्रतिकात्मक साजरा करणे अधिक योग्य होईल असे वाटते.