Tuesday, 22 March 2016

होळी(हुताशनी पौर्णिमा)

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. 

तिथी

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

समानार्थी शब्द


उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला वसंतोत्सवअथवा वसंतागमनोत्सवम्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.

इतिहास


पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावले. त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली.’ – भविष्यपुराण

उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.

एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात होलीया नावाने यज्ञ होऊ लागले.

या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास यर्व्यऋषींनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.’ (स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते पलाश के फूल’, असे म्हणतात.)
ब्रह्मतत्त्व

पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी यज्ञात प्रगटलेल्या देवतेच्या शक्‍तीची मारक शक्‍ती आणि सात्त्विकता सहन न झाल्याने वातावरणातील वाईट शक्‍ती प्रचंड गतीने आणि सैरभैर सुसाट धावत सुटल्या. त्यामुळे वातावरणात ठिकठिकाणी दाब निर्माण झाला. त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या सूक्ष्म पोकळ्या भरून निघतांना वाईट शक्‍तींनी एकमेकांवर आदळतांना हुताशनी निनाद केला; म्हणून होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमाअसेही म्हणतात.
– ‘दैनिक लोकमत’, १९.३.२०११

ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्‍या खेळतात.

महत्त्व

विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण
होळी हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.

होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.

होळी सद्‍गुण ग्रहण करण्याची /अंगिकारण्याची संधी आहे.

होळी संजीवनी आहे, जी साधकांची साधना पुनर्जीवित करते.


होळीची रचना

देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्‍या होळीया सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची आणि तिला सजवण्याची पद्धतस्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते. होळीची रचना शास्त्रीय पद्धतीने नेमकी कशी करावी, याविषयीची माहिती

स्थान आणि वेळ


देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.

कृती


श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करतात. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचतात. प्रथम कर्त्याने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून
सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।
असा संकल्प करावा आणि नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा.
त्यानंतर होलिकायै नमः ।
असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. सारी रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करावे. ती राख अंगाला लावावी आणि स्नान करावे, म्हणजे आधी-व्याधी यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा किंवा चिंता आणि व्याधी म्हणजे रोग.) सकाळी अश्‍लील बोलून होळीची रक्षा विसर्जित करावी. त्यानंतर होळीची प्रार्थना करावी.

होळीची रचना करतांना मधोमध एरंड, नारळ, सुपारी किंवा ऊस उभा ठेवण्यामागील शास्त्र


१. एरंड : एरंडाचा धूर वाईट शक्‍तींनी वातावरणात पसरवलेल्या दुर्गंधीयुक्‍त वायूला नष्ट करतो.

२. नारळ : नारळाकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडमंडलातील सात्त्विक लहरींमुळे होळीतील अग्नीरूपी तेजस्वरूप शक्‍तीतील देवत्व टिकून रहाण्यास साहाय्य होते.

३. सुपारी : सुपारीचा मूळ गुणधर्म रजोगुण धारण करण्याचा असल्याने या रजोगुणाच्या साहाय्याने होळीतील तेजाच्या कार्य करण्याच्या गुणधर्मात वृद्धी होते.

४. ऊस : ऊस हाही प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असल्याने याच्या सान्निध्यामुळे वायूमंडलात होळीतील शक्‍तीरूपी तेज प्रक्षेपित होण्यास आणि वायूमंडलाची शुद्धी अल्प कालावधीत होण्यास साहाय्य होते.


होळीची रचना करतांना वापरावयाचे एरंड, नारळ, सुपारी किंवा ऊस यांचा आकार


ऊस
ऊस संपूर्ण घ्यावा. उसाच्या खोडातून, तसेच पानातून प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण होत असते. हे खोड होळीत घनीभूत झालेल्या अग्नीरूपी तेजाला प्रवाही बनवून त्याचे वायूमंडलात कारंजासारखे प्रक्षेपण करते. हा रजोगुणात्मक लहरींचा तेजरूपी कारंजा परिसरातील रज-तमात्मक लहरींचा नाश करतो. यामुळे वायूमंडलाची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

झाडाचे खोड
झाडाच्या खोडाची उंची ४ फुटापर्यंत असावी.

होळीची रचना करतांना तिचा आकार शंकूसारखा असण्यामागील शास्त्र


शंकूसारखा आकार इच्छाशक्‍तीचे प्रतीक आहे.

होळीच्या रचनेतील शंकूसारख्या आकारात घनीभूत होणारे अग्नीस्वरूपी तेजतत्त्व भूमंडलावर आच्छादीत झाल्याने तिचा भूमीला लाभ मिळण्यास साहाय्य होते आणि पाताळातून भूगर्भाच्या दिशेने प्रसारीत होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते.

या रचनेतील घनीभूत तेजाच्या अधिष्ठानामुळे भूमंडलातील स्थानदेवता, वास्तूदेवता आणि ग्रामदेवता अशा क्षुद्रदेवतांचे तत्त्व जागृत झाल्याने भूमीमंडलातील वाईट शक्‍तींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साधले जाते.

शंकूच्या आकारात घनीभूत झालेल्या अग्नीरूपी तेजाच्या संपर्कात येणार्‍या जिवाची मनःशक्‍ती जागृत होण्यास साहाय्य झाल्याने त्याच्या कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होऊन त्याला इच्छित फलप्राप्ती होणे शक्य होते.

होळीतील बोंब मारणेया कृतीमागील शास्त्र


हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर अर्वाच्च भाषेत बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. बोंब मारण्यामागील नेमके शास्त्र, त्यापासून होणारा लाभ आणि विकृती केल्यास होणारी हानी यांविषयी

अर्वाच्च उच्चारण करण्याचा अर्थ


मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता भगही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्यगायन करण्याची प्रथा आहे.

हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला हुताश्‍नअसे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला सूक्ष्म हुताश्‍नम्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.


संदर्भ:

sanatan.org

No comments:

Post a Comment