Monday, 7 March 2016

दिनविशेष - ९ मार्च २०१६

तिथी
 माघ अमावास्या (७:२५), फाल्गुन शुक्ल १ (२८:०१) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (२१:०२)
योग
 साध्य (१२:५४)
करण
 किंस्तुग्ध्न (१७:४४)

खग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तोदित)

भारत, श्रीलंका, नेपाळसह पूर्व आशिया, चीनचा दक्षिणेकडील प्रदेश, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अलास्का आणि कॅनडाचा पश्चिमेकडील काही प्रदेश, पॅसिफिक आणि हिंदी महासागर या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे.

हे ग्रहण खग्रास असले तरी भारतात हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे. भारतात ग्रस्त झालेले सूर्यबिंब उदयास येईल. म्हणून भारतामध्य़े हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरुपाचे असेल. भारताच्या पश्चिमेकडील काही प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार नाही.

पुण्यकाल

सूर्योदयापासून ग्रहणमोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे.

ग्रहणाचे वेध

ग्रस्तोदित ग्रहण असल्याने सूर्योदयाच्या चार प्रहर आधी म्हणजेच 8 मार्च मंगळवारच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, आजारी, अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रीयांनी मंगळवारी रात्री ९ पासून वेध पाळावेत. ज्या प्रदेशात ग्रहण दिसत नाही अशा प्रदेशांत ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
सूर्यग्रहण असल्याने प्रत्येक गावाची स्पर्श, मध्य, मोक्ष वेळ ही वेगवेगळी असते आणि 9 मार्च च्या
सूर्यग्रहणाचा स्पर्श व मध्य सूर्योदयापूर्वी असेल.

ग्रहणातील कृत्ये

ग्रहणवेध काळ आणि ग्रहण पर्वकाळ ( पुण्यकाळ ) यामध्ये फरक आहे.
वेधकाळाचा कालावधी मोक्षवेळेपर्यंत ( साधारण पणे 12 तासापेक्षा जास्ती )  असतो आणि पर्वकाळ (सुमारे 5 मिनिटापासून 2ते 3 तासापर्यंत असतो).
वेधकाळात भोजन निषेध असल्याने याकाळात अन्नपदार्थ खाऊ नयेत मात्र इतर आवश्यक असे जलपान, मलमूत्रोत्सर्ग, निद्रा अशा गोष्टी करता येतात परंतु या गोष्टी ग्रहण पर्वकाळात करता येत नाहीत.  ग्रहण पर्वकाळात स्नान, पूजा, जप, दान इ, कर्मे करावीत.

मंत्र-तंत्र पुरश्चरणासंबंधी

नवीन मंत्र घेण्यास व गृहीत मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.

स्नानाविषयी

ग्रहणात सर्व उदक गंगेसामान आहे. तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्व सांगितले आहे. नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.

ग्रहणाचे राशीपारात्वे फळ

मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फळ आहे.
मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फळ आहे.
कर्क, वृश्चिक,कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फळ आहे.
ज्यांना अनिष्ट फल आहे त्यांनी आणि गरोदर स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment