तिथी
|
आषाढ शुक्ल १२ (२७:३२)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (११:५६)
|
योग
|
शुक्ल (१७:५१)
|
करण
|
बव (१४:५४)
|
तिथीवासर
द्वादशीच्या प्रथम पादाला
हरीवासर असे म्हणतात.वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.
८:२९ पर्यंत तिथीवासर /
हरीवासर आहे.
शाक-गोपद्म व्रतारंभ
स्नान
करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करावी. कार्तिक शुल्क
एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.
वामन पूजन
आषाढ शुक्ल द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन करून व्रत केल्यास यज्ञासमान
फळ मिळते. व्रत असे आहे- प्रत्यक्षमूर्ती असेल तर तिच्यासमोर बसावे; नसेल तर सोन्याची करून
तांब्याच्या संपुष्टात तुलसीपत्रावर स्थापन करावी. तेही शक्य नसेल तर
शालिग्रामाच्या मूर्तीची पुरुषसूक्तोक्त मंत्राने षोडशोपचार पूजा करावी
रवि कर्क राशीत प्रवेश
१०:१५ ला रवि कर्क राशीत
प्रवेश करीत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, कर्क राशीसाठी संक्रमणापूर्वी ३०
घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान,
दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल सूर्योदय ते १०:१५ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
घबाड
११:५६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पुनर्वसु
चंद्र
नक्षत्र : अनुराधा
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी
मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment