तिथी
|
आषाढ शुक्ल १४ (२८:४०)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
मूळ (१५:०३)
|
योग
|
ऐंद्र (१७:१२)
|
करण
|
गरज (१६:३६)
|
महाराष्ट्रीय बेंदूर
वर्षभर शेतात कष्ट करून बळीराजाला(शेतकऱ्याला) शेतातून सोनं(धान्य) पिकवून
देणाऱ्या बळीराजाच्या खऱ्या मित्राचा हा सण आहे.
वर्षभर उन,वारा आणि पावसात सतत कष्ट करणारे "बैल" यांच्यासाठी हा सोन्याचा
दिवस.
सर्व शेतकरी बांधव अगदी देवाप्रमाणे आपल्या या मित्राला सजवून अगदी डौलात
त्यांची मिरवणूक काढतात.
कारण बळीराजासाठी ते देवापेक्षा कमी नसतात.
मिरवणुकीनंतर मग त्यांना मानाचा"पुरणपोळी" चा नैवेद्य दाखवतात.
अंबिकाव्रत
आषाढ शुक्ल चतुर्दशीला उपवास करुन पौर्णिमेला प्रातःकाळी अंबिकादेवीचे पूजन
करण्याने यज्ञासमान फळ मिळून विष्णुलोक प्राप्त होतो.
हरिपूजा
आषाढ शुक्ल चतुर्दशीला ला उपवास करुन पौर्णिमेला पूर्वान्ही (सकाळी) भगवान
हरीचे (विष्णूचे) पूजन गंध, धूपदीप, पुष्प, नैवेद्य यांनी करावे, व जर त्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर अन्नोदकाचे दान करुन एकभुक्त
राहावे.
भद्रा
२८:४० नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment