Saturday, 31 October 2015

दिनविशेष - १ नोव्हेंबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ६ (२८:५१) 
वार
 रविवार
नक्षत्र
 आर्द्रा (१५:४६)
योग
 सिद्ध (२४:५८)
करण
 गरज (१६:५५)

भद्रा


२८:५१ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 29 October 2015

दिनविशेष - ३१ ऑक्टोबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ५ (२९:१३) 
वार
 शनिवार
नक्षत्र
 मृग (१५:५७)
योग
 शिव (२६:३०)
करण
 कौलाव (१७:४३)

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - ३० ऑक्टोबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ३ (८:२५), आश्विन वद्य ४ (३०:२६) 
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 रोहिणी (१६:५७)
योग
 वरीयान (७:३१), परिघ (२८:४३)
करण
 बव (१९:२०)

संकष्टी चतुर्थी

पुणे चंद्रोदय : २०:४९
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

करक चतुर्थी

आश्‍विन व. चतुर्थीला (जी चंद्रोदयव्यापिनी ) हे व्रत करतात. जर चतुर्थी दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस नसेल तर 'मातृविद्धा प्रशस्यते' या न्यायाने पूर्वविद्धा मानावी.
या व्रतात शिव-शिवा, कार्तिकस्वामी व चंद्र यांची पूजा करावी. नैवेद्यासाठी गुळ-पापडीचे लाडू वगैरे करवे ठेवावेत. हे व्रत सामान्यपणे लग्न झालेल्या स्त्रिया (सौभाग्यवती) अगर त्याच वर्षी लग्न झालेल्या मुलींनीही करावे. नैवेद्याचे १३ लाडू अगर करवे, १ कापड, १ भांडे, व विशेष लाडू सासूसासर्‍यांना द्यावेत.
हे व्रत करणार्‍यांनी त्या दिवशी आंघोळ इ. नित्यकर्मे पुरी करून
'मम सुखसौभाग्यपुत्रपौत्रादि सुस्थिर श्रीप्राप्तये करकचतुर्थीव्रतमहं करिष्ये ।'
हा संकल्प करुन वाळुवर पिंपळाच्या वृक्षाचे चित्र काढून त्याखाली शिवशिवा (पार्वती ) व षडानन यांच्या मुर्ती अगर चित्र यांची स्थापना करून
नम: शिवायै शर्वाण्ये सौभाग्यं संततिं शुभाम् ।
प्रयच्छ भक्तियुक्‍तानां नारीणां हरवल्लभे ।'
या मंत्राने पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
'नम: शिवाय'षण्मुखाय नम:'
या मंत्रांनी अनुक्रमे शंकर व कार्तिकस्वामी यांची पूजा करून करव्याचा अगर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन व ब्राह्मणाला दक्षिणा देऊन मग स्वत: जेवावे.

करवा चौथ

भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रांतात लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्य व स्वास्थ्य यासाठी  आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. दिवसभर उपवास करून रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर अन्नग्रहण करावे. हे व्रत १२ किंवा १६ वर्ष करतात. त्यानंतर याचे उद्यापन करता येते. मात्र ज्यांना आजीवन हे व्रत करायचे आहे त्यांनी अखंड हे व्रत करत राहावे. 

दशरथपूजा

आश्‍विन व. चतुर्थी रोजी दशरथाची पूजा करून तेथेच दुर्गापूजन केल्यास सर्व सुखांचा लाभ होतो.

यमघंट योग

१६:५७ पर्यंत शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



घबाड

१६:५७ नंतर ३०:२६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: स्वाती
चंद्र नक्षत्र : मृग
तिथी: १५+४ =१९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा

०८:२५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

क्षयदिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 28 October 2015

दिनविशेष - २९ ऑक्टोबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य २ (११:०२)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 कृत्तिका (१८:३७)
योग
 व्यतीपात (१०:५१)
करण
 वणिज (२१:३९)

यमघंट योग

१८:३७ पर्यंत गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



भद्रा


२१:३९ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Tuesday, 27 October 2015

दिनविशेष - २८ ऑक्टोबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य १ (१४:०९)
वार
 बुधवार
नक्षत्र
 भरणी (२०:५०)
योग
 सिद्धी (१४:३५)
करण
 तैतिल (२४:३३)

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Sunday, 25 October 2015

दिनविशेष - २७ ऑक्टोबर २०१५


तिथी
 आश्विन शु १५ (१७:३५)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 अश्विनी (२३:२५)
योग
 वज्र (१८:३४)
करण
 विष्टी (७:२२), बालव (२७:५०)

कार्तिकस्नानारंभ

सर्व धर्मकृत्यांत स्नानास फार महत्त्व असून त्याची फार आवश्यकता असते. तसेच, स्नानामुळे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण व निरोगीपण यात वाढ होते. माघ, कार्तिक व वैशाख या महिन्यांतील नित्य स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे.
कार्तिकं सकलं मासं नित्यस्नायी जितेंद्रिय: ।
जपन् हविष्यभुक्‌छान्त: सर्वपापै: प्रमुच्यते ॥'
अर्थ - संपूर्ण कार्तिक महिनाभर जितेन्दिय राहून नित्य स्नान केले व हविष्यान्न घेतले तर सर्व पापांपासून मुक्‍ती मिळते.
हे व्रत आश्‍विन पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावे व त्या दिवशी समाप्ती करावी. किंवा या स्नानाची सुरुवात दशमी किंवा एकादशीपासून करतात. या काळात स्नानासाठी विहीर अगर तळे यांचा वापर करावा. कुरुक्षेत्र, अयोध्या इ. तीर्थे व पुर्‍या व काशीच्या पाचही नद्यांतील स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे. असे योग दुर्लभ असतात. पाण्यात उतरण्यापूर्वी बाहेरच हातपाय धुवावेत. आचमने करून शेंडीस गाठ मारून दर्भाने संकल्प सोडून मगच स्नान करावे.
हे कार्तिक स्नान पुत्रप्राप्तीसाठी व्रत म्हणून केले असेल तर स्नानानंतर अभिलाष्टक नावाचे स्तोत्र पठण करावे. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास निदान कार्तिक शु. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस करावे.

जेष्ठ आपत्यास ओवाळणे / आश्‍विनी

आश्‍विन पौर्णिमेस तिन्हीसांजा आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला (मुलगा किंवा मुलगी) ओवाळून त्याचे औक्षण करते व त्याला दूध प्यायला देते. विशेषत: महाराष्ट्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्‍विनी करणे, असे म्हणतात.

आग्रयण

नवान्नप्राशन

आश्विन पौर्णिमेस  नवीन धान्याचें भक्षण;  नवीन तांदुळाच्या केलेल्या भाताचा स्थालीपाक (  होम )  करुन तो भक्षण करावे

कुलधर्म


अमृतयोग

२३:२५ पर्यंत मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे.
इतर सर्व कार्यासाठी हा शुभ योग असला तरी गृहप्रवेशाश वर्ज आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज


भद्रा

७:२२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.

ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट