तिथी
|
आश्विन शु १५ (१७:३५)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (२३:२५)
|
योग
|
वज्र (१८:३४)
|
करण
|
विष्टी (७:२२), बालव (२७:५०)
|
कार्तिकस्नानारंभ
सर्व
धर्मकृत्यांत स्नानास फार महत्त्व असून त्याची फार आवश्यकता असते. तसेच, स्नानामुळे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण व निरोगीपण यात वाढ
होते. माघ, कार्तिक व वैशाख या महिन्यांतील नित्य स्नानाला
तर आगळेच महत्त्व आहे.
कार्तिकं सकलं
मासं नित्यस्नायी जितेंद्रिय: ।
जपन् हविष्यभुक्छान्त:
सर्वपापै: प्रमुच्यते ॥'
अर्थ - संपूर्ण
कार्तिक महिनाभर जितेन्दिय राहून नित्य स्नान केले व हविष्यान्न घेतले तर सर्व
पापांपासून मुक्ती मिळते.
हे व्रत आश्विन
पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावे व त्या
दिवशी समाप्ती करावी. किंवा या स्नानाची सुरुवात दशमी किंवा एकादशीपासून करतात. या
काळात स्नानासाठी विहीर अगर तळे यांचा वापर करावा. कुरुक्षेत्र, अयोध्या इ. तीर्थे व पुर्या व काशीच्या पाचही नद्यांतील
स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे. असे योग दुर्लभ असतात. पाण्यात उतरण्यापूर्वी
बाहेरच हातपाय धुवावेत. आचमने करून शेंडीस गाठ मारून दर्भाने संकल्प सोडून मगच
स्नान करावे.
हे कार्तिक स्नान
पुत्रप्राप्तीसाठी व्रत म्हणून केले असेल तर स्नानानंतर अभिलाष्टक नावाचे स्तोत्र
पठण करावे. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास निदान कार्तिक शु.
एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस करावे.
जेष्ठ आपत्यास ओवाळणे / आश्विनी
आश्विन
पौर्णिमेस तिन्हीसांजा आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला (मुलगा किंवा मुलगी)
ओवाळून त्याचे औक्षण करते व त्याला दूध प्यायला देते. विशेषत: महाराष्ट्रात हा
प्रघात आहे. याला मुलांची आश्विनी करणे, असे म्हणतात.
आग्रयण
नवान्नप्राशन
आश्विन
पौर्णिमेस नवीन धान्याचें भक्षण; नवीन तांदुळाच्या
केलेल्या भाताचा स्थालीपाक ( होम ) करुन तो भक्षण करावे
कुलधर्म
अमृतयोग
२३:२५ पर्यंत मंगळवारी
अश्विनी नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे.
इतर सर्व कार्यासाठी हा शुभ
योग असला तरी गृहप्रवेशाश वर्ज आहे. हा योग नक्षत्र आणि
वार यांच्या संयोगाने हा योग होतो.
पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
भद्रा
७:२२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment